AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक अन् मराठा आरक्षणावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्ट भाष्य; म्हणाले…

Chandrashekhar Bawankule on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं महाराष्ट्राच्या मूडवर भाष्य. आगामी लोकसभा निवडणुकीवर स्पष्ट बोलले. पाहा काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे....

Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक अन् मराठा आरक्षणावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्ट भाष्य; म्हणाले...
| Updated on: Oct 17, 2023 | 2:28 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 17 ऑक्टोबर 2023 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज ठाणे शहर दौऱ्यावर आहेत. ठाणे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा शहराचा दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडून टघर चलो’ अभियान राबवलं जातंय. जुन्या स्टेशन रोडवरील व्यापारी आणि नागरिकांबरोबर संवाद साधण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत? मोदी सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे लोकांना प्रश्न विचारत आहेत. ठाण्याचा खासदार हा आमचा संकल्प आहे. इथला सर्वात जास्त मताने येणार आहेत. भाजपचं नाव न घेता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मी आज ठाण्यात फिरलो. नरेंद्र मोदी हेच येत्या काळातही पंतप्रधान झाले पाहिजेत, असं सर्वसामान्य लोक म्हणत आहेत. महाराष्ट्राचे विधानसभेमध्ये 100 महिला आमदार असतील. तरूण वर्गदेखील येणाऱ्या काळात आताचे मोदीच निवडून येणार असं म्हणत आहेत. घर चलो अभियान आम्ही राबवत आहोत. मागच्या 9 वर्षात केलेली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आज ठाण्यात संवाद सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या कामाचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवतोय. ठाण्यातील साडेतीन लक्ष घरी पोहचणार आहोत. लोकांपर्यंत सरकारचं काम पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. आमचे आमदार 288 मतदारसंघात हा प्रवास करणार आहेत. निवडणूक येणारा उमेदवार हा महायुतीचा खासदार असणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांच्या महाविजयची तयारी आम्ही करत आहोत, असंही बावनकुळे म्हणालेत.

ठाणे आणि कल्याण हा मतदारसंघ ना कोणी मागितला ना कोणी दिला… जागेचा वाटप जे होईल. पण हा मतदारसंघ महायुतीतीलच मित्र पक्षाकडे जाईल. शिंदे गटाकडे, अजितदादांकडे किंवा आमच्याकडे असेल. पण जो उमेदवार दिला जाईल. त्याला निवडणून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोणाकडे किती जागा जातील, हे केंद्रीय समिती ठरवेल. राज्यात 45 खासदार निवडून आणायचा संकल्प असणार आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्या करण्याकरता एक दिलाने आम्ही काम करत आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या नाकारतेपणामुळे हे आरक्षण गेलं. हे रेकॉर्ड वरती आहे. हे रेकॉर्ड वरती राहणार आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी सक्षम आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी सरकार काम करत आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.