AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल […]

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 2:24 PM
Share

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल आज सकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पूल धोकादायक झाला असल्याने ग्रामस्थांनी नव्याने बांधण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीनुसार पुलाच्या डागडुजीसाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र डागडुजीला सुरुवात झाली नसल्याने पुलाचा काही भाग आज खचला आहे. या पुलावर मोठा खड्डा पडल्याने या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली असून पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पुलावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या पूलाचे कठडे कोसळण्याची घटना घडली होता. यावर्षी पूलाचा काही भागच खचला असून पूलाला भगदाड पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पूलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला असून तो पावसात कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मलंगगड परिसरात असलेल्या चिरड, शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक झाला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.