AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल […]

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
| Edited By: Nitish Gadge | Updated on: Jul 15, 2022 | 2:24 PM
Share

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल आज सकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पूल धोकादायक झाला असल्याने ग्रामस्थांनी नव्याने बांधण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीनुसार पुलाच्या डागडुजीसाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र डागडुजीला सुरुवात झाली नसल्याने पुलाचा काही भाग आज खचला आहे. या पुलावर मोठा खड्डा पडल्याने या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली असून पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पुलावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या पूलाचे कठडे कोसळण्याची घटना घडली होता. यावर्षी पूलाचा काही भागच खचला असून पूलाला भगदाड पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पूलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला असून तो पावसात कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मलंगगड परिसरात असलेल्या चिरड, शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक झाला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?