AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल […]

Thane: अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावचा पूल खचला, ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
| Edited By: Nitish Gadge | Updated on: Jul 15, 2022 | 2:24 PM
Share

ठाणे,  अंबरनाथ तालुक्यातील चिरड गावच्या (Chirad village)  पुलाचा काही भाग खचला (bridge collapse) आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील गावं आणि खोणी तळोजा राज्य महामार्गाला चिरड गावचा पूल जोडतो. हा पूल आज सकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पूल धोकादायक झाला असल्याने ग्रामस्थांनी नव्याने बांधण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीनुसार पुलाच्या डागडुजीसाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र डागडुजीला सुरुवात झाली नसल्याने पुलाचा काही भाग आज खचला आहे. या पुलावर मोठा खड्डा पडल्याने या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली असून पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पुलावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या पूलाचे कठडे कोसळण्याची घटना घडली होता. यावर्षी पूलाचा काही भागच खचला असून पूलाला भगदाड पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पूलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला असून तो पावसात कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मलंगगड परिसरात असलेल्या चिरड, शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक झाला आहे.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......