AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण, डोंबिवलीत का होते वाहतूक कोंडी?; वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?

अपघातांची शक्यता असते असं काही डोंबिवलीकरांनी सांगितलं. मात्र लोकांसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींचाही वरचष्मा रिक्षा युनियनवर आहे.

कल्याण, डोंबिवलीत का होते वाहतूक कोंडी?; वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?
| Edited By: | Updated on: Mar 28, 2023 | 1:12 PM
Share

ठाणे : कल्याण, डोंबिवली शहरं ही सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांची शहरं म्हणून ओळखली जातात. बहुतांश चाकरमानी हे प्रवासासाठी रिक्षांवर अवलंबून असतात. त्यातच परमिट प्रक्रिया सोपी झाल्याने रिक्षांची संख्या देखील वाढली आहे. अनेकदा रिक्षा या वाटेल तशा उभ्या केलेल्या असतात. त्यातच भाडं दिसलं की कुठेही प्रवासी घेण्यासाठी रिक्षा उभ्या केल्या जातात. एक रिक्षा रस्त्यात थांबली की मागे वाहनांची रांग लागते. मोकळी जागा दिसली की कुठेही रिक्षा उभी केली जाते.

वाहतूक विभाग, आरटीओचं नियंत्रण नाही

कल्याण, डोंबिवली शहराच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र ही वाहतूक कोंडी का होते याबाबत कल्याण डोंबिवलीकरांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. शहरात विशेषतः भाडे सोडण्यासाठी आणि भरण्यासाठी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक विभाग आणि आरटीओ यांचं कोणतंही नियंत्रण रिक्षांवर नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

thane 2 n

प्रवासी संघटनेने केला आरोप

शहरात वाहतूक कोंडी ही रिक्षांमुळे होत असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. अतिरिक्त रिक्षाही वाढल्या आहेत. रिक्षाचालकांची तपासणी केली जात नाही. कागदपत्रे बघितली जात नाही. आरटीओ आणि वाहतूक विभागाचे कोणतंही नियंत्रण रिक्षाचालकांवर नाही, असा आरोपी एमएच 05 या प्रवासी संघटनेने केला आहे.

लोकप्रतिनिधींचे युनियनवर वर्चस्व

रिक्षाचालक बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करतात. मर्जीप्रमाणे भाडं घेतात. वाहनांच्या सलग रांगेतून मध्येच प्रवासी भाडं घ्यायला रिक्षा थांबवतात. यामुळे अपघातांची शक्यता असते असं काही डोंबिवलीकरांनी सांगितलं. मात्र लोकांसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींचाही वरचष्मा रिक्षा युनियनवर आहे.

आतातरी शिस्त लावणार का?

आपल्याच नागरिकांना होणाऱ्या त्रासावर युनियन नेते पुढाकार घेतील का ते पाहावं लागेल. त्याचप्रमाणे आरटीओ आणि वाहतूक विभाग हे रिक्षा चालकांना शिस्त लावतात का? त्यावरही नागरिक लक्ष ठेवून आहेत. कारण कायद्याची कोणतीही भीती नसल्याने हा मनमानी कारभार सुरू असल्याचं कल्याण डोंबिवलीकरांनी सांगितलं आहे. आतातरी शिस्त लावणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....