AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दबाव टाकून राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न!, अमोल मिटकरी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप; सरकार बदलाच्या चर्चेला वेग

सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दबाव टाकून राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न!, अमोल मिटकरी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप; सरकार बदलाच्या चर्चेला वेग
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 10:40 PM
Share

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसवर जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना विचारलं असता, राऊत साहेबांच्या मताशी मी सहमत असल्याचं मिटकरी म्हणाले. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत मिटकरी यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, ज्या अंजली दमानिया यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या याबाबत ट्विट करतात आणि त्याच्या बातम्या बनतात. अजित दादा हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे माहिती आहे.

जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न

आता ज्या काही घडामोडी टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये अजिबात तथ्य नाही. हा दादांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. तर राज्यातलं सध्याचं सरकार हे जास्त दिवस टिकणार नसल्याचाही दावा त्यांनी केला.

आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही आणि राज्यात लवकरच एक नवीन महाविकास आघाडीचं सरकार येईल, असं अमोल मिटकरी म्हणाले.

हवाई दौरे करण्यात सरकार गुंतले

राज्यात शेतकरी अडचणीत आहे. अकोला जिल्ह्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली. मात्र कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही पंचनामे करण्यात आले नाहीत. शेतकऱ्यांना कोणतीही भरपाईसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे हे सरकार जर राम राज्याची वल्गना करत असेल, तर या राम राज्यात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसंच या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त स्वतःची पब्लिसिटी आणि हवाई दौरे करायचे. यातच सरकार गुंतलेलं आहे. म्हणून हे सरकार जास्त दिवस राहील असं मला वाटत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...