AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धरणामुळे ‘या’ गावाचे मरण आले; शेतीमालक झाले भूमिहीन…

ज्यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी आणि कालव्यांसाठी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यावर होणारा अन्याय सरकार कधी दूर करणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

धरणामुळे 'या' गावाचे मरण आले; शेतीमालक झाले भूमिहीन...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 01, 2023 | 10:32 PM
Share

अकोले /अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्पासाठी जमिन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र अडचणीचा ठरला आहे. अकोले तालुक्यातील धरणग्रस्तांनी आज तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केल आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारा निळवंडे धरण प्रकल्प पन्नास वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. अतिशय संथ गतीने काम सुरू असलेल्या निळवंडे धरणातून आपल्या शेतीला पाणी मिळणार या आशेवर दोन पिढ्यांनी त्यासाठी संघर्ष केला. आता मात्र धरणाच्या कालव्यांचे जवळपास 90 टक्के काम झाले असून लवकरच शेतात पाणी खळाळणार आहे.

या लाभक्षेत्रातील जनता एकीकडे आनंदी आहे तर दुसरीकडे मात्र ज्यांनी धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना आजही आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागतं आहे.

निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे आता अंतिम टप्प्यात आहे, मात्र ही कामं करत असताना शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी शेतीमार्गच राहिले नाहीत.

त्यामुळे अरूंद रस्त्यावरून प्रवास करताना आत्तापर्यंत तीन जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आता शासन आमच्यावर अन्याय का करते आहे असा सवाल आता उपस्थित केला आहे. शासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच आता धरणग्रस्तांनी आता आंदोलन पुकारले आहे.

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील महिला पुरूषांनी अकोले तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

विविध मागण्यांसाठी आता शेकडो महिला पुरूष तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. शासनाने धरणग्रस्तांवर अन्याय केला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पंतप्रधान काय राष्ट्रपती जरी उद्घाटनाला आले तर कार्यक्रम उधळून लावू असा इशाराच आता आंदोलकांनी दिला आहे.

ज्यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी आणि कालव्यांसाठी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यावर होणारा अन्याय सरकार कधी दूर करणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान