AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना ‘या’ नेत्याचा थेट सवाल, ‘मागच्या सरकारबद्दल…’

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगर येथे पार पडली. राज्याचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. मात्र, यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना 'या' नेत्याचा थेट सवाल, 'मागच्या सरकारबद्दल...'
CM EKNATH SHINDE AND AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Sep 16, 2023 | 6:18 PM
Share

संभाजीनगर : 16 सप्टेंबर 2023 | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये पार पाडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर पुन्हा टीका केली. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने पलटवार केला. हे सरकार मराठवाड्याच खून करत आहे अशी टीकाही या नेत्याने केली.

राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसरकारवर घणाघाती शाब्दिक हल्ला केलाय. राज्यसरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मात्र, यातून केवळ फसव्या घोषणा केल्या. हे सरकार मराठवाड्याचा खून करत आहे अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा ग्रीड प्रकल्पाला पैसे दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ते काम केले होते. आता राज्यसरकारने 14 हजार कोटीची तरतूद केली. पण, सर्वेक्षणासाठी 50 कोटी खर्च करता येत नाहीत. सरकार फक्त थापा मारत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात जलजीवन योजनेमध्ये किती टक्केवारी मिळते यामध्ये मंत्री आणि अधिकारी गुंतले आहेत. अधिकारी आणि मंत्री मिळून राज्यातील जनतेला देशोधडीला लावत आहेत. काही जुन्या घोषणाच पुन्हा नव्याने मांडल्या आहेत.

सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच दिले नाही. एनडीआरएफ आणि एचडीआरएफ निकष याबाबतचा उल्लेख सरकारने केला होता. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. संभाजीनगर याचा पहिला उल्लेख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शासन निर्णय घेतला. पण, पुढे या सरकारने काहीच केले नाही असा आरोपही त्यांनी केला.

मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकार त्यावर काही बोलत नाही. राज्यात हे करंटे सरकार आल्यावरच आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री उपमुख्यमंत्री होते. राज्य मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय हे सर्व मंत्री यांच्या मान्यतेने घेण्यात येतात. मग, आता हेच गेल्या सरकारमधील मंत्री, उपमुख्यमंत्री मागच्या सरकारबद्दल कसे बोलतात? असा थेट सवाल त्यांनी केला. जालना शीड पार्कला जागा मिळवून देण्याचे काम सुभाष देसाई यांनी केले होते याची आठवणही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी करून दिली.

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!