मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना ‘या’ नेत्याचा थेट सवाल, ‘मागच्या सरकारबद्दल…’

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगर येथे पार पडली. राज्याचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. मात्र, यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना 'या' नेत्याचा थेट सवाल, 'मागच्या सरकारबद्दल...'
CM EKNATH SHINDE AND AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 6:18 PM

संभाजीनगर : 16 सप्टेंबर 2023 | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये पार पाडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर पुन्हा टीका केली. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने पलटवार केला. हे सरकार मराठवाड्याच खून करत आहे अशी टीकाही या नेत्याने केली.

राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसरकारवर घणाघाती शाब्दिक हल्ला केलाय. राज्यसरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मात्र, यातून केवळ फसव्या घोषणा केल्या. हे सरकार मराठवाड्याचा खून करत आहे अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा ग्रीड प्रकल्पाला पैसे दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ते काम केले होते. आता राज्यसरकारने 14 हजार कोटीची तरतूद केली. पण, सर्वेक्षणासाठी 50 कोटी खर्च करता येत नाहीत. सरकार फक्त थापा मारत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

राज्यात जलजीवन योजनेमध्ये किती टक्केवारी मिळते यामध्ये मंत्री आणि अधिकारी गुंतले आहेत. अधिकारी आणि मंत्री मिळून राज्यातील जनतेला देशोधडीला लावत आहेत. काही जुन्या घोषणाच पुन्हा नव्याने मांडल्या आहेत.

सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच दिले नाही. एनडीआरएफ आणि एचडीआरएफ निकष याबाबतचा उल्लेख सरकारने केला होता. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. संभाजीनगर याचा पहिला उल्लेख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शासन निर्णय घेतला. पण, पुढे या सरकारने काहीच केले नाही असा आरोपही त्यांनी केला.

मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकार त्यावर काही बोलत नाही. राज्यात हे करंटे सरकार आल्यावरच आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री उपमुख्यमंत्री होते. राज्य मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय हे सर्व मंत्री यांच्या मान्यतेने घेण्यात येतात. मग, आता हेच गेल्या सरकारमधील मंत्री, उपमुख्यमंत्री मागच्या सरकारबद्दल कसे बोलतात? असा थेट सवाल त्यांनी केला. जालना शीड पार्कला जागा मिळवून देण्याचे काम सुभाष देसाई यांनी केले होते याची आठवणही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी करून दिली.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.