AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना ‘या’ नेत्याचा थेट सवाल, ‘मागच्या सरकारबद्दल…’

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगर येथे पार पडली. राज्याचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. मात्र, यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा यांना 'या' नेत्याचा थेट सवाल, 'मागच्या सरकारबद्दल...'
CM EKNATH SHINDE AND AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 16, 2023 | 6:18 PM
Share

संभाजीनगर : 16 सप्टेंबर 2023 | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये पार पाडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळावर पुन्हा टीका केली. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने पलटवार केला. हे सरकार मराठवाड्याच खून करत आहे अशी टीकाही या नेत्याने केली.

राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसरकारवर घणाघाती शाब्दिक हल्ला केलाय. राज्यसरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मात्र, यातून केवळ फसव्या घोषणा केल्या. हे सरकार मराठवाड्याचा खून करत आहे अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा ग्रीड प्रकल्पाला पैसे दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ते काम केले होते. आता राज्यसरकारने 14 हजार कोटीची तरतूद केली. पण, सर्वेक्षणासाठी 50 कोटी खर्च करता येत नाहीत. सरकार फक्त थापा मारत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात जलजीवन योजनेमध्ये किती टक्केवारी मिळते यामध्ये मंत्री आणि अधिकारी गुंतले आहेत. अधिकारी आणि मंत्री मिळून राज्यातील जनतेला देशोधडीला लावत आहेत. काही जुन्या घोषणाच पुन्हा नव्याने मांडल्या आहेत.

सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच दिले नाही. एनडीआरएफ आणि एचडीआरएफ निकष याबाबतचा उल्लेख सरकारने केला होता. पण, त्याचे पुढे काहीच झाले नाही. संभाजीनगर याचा पहिला उल्लेख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शासन निर्णय घेतला. पण, पुढे या सरकारने काहीच केले नाही असा आरोपही त्यांनी केला.

मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकार त्यावर काही बोलत नाही. राज्यात हे करंटे सरकार आल्यावरच आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री उपमुख्यमंत्री होते. राज्य मंत्रीमंडळामध्ये होणारे निर्णय हे सर्व मंत्री यांच्या मान्यतेने घेण्यात येतात. मग, आता हेच गेल्या सरकारमधील मंत्री, उपमुख्यमंत्री मागच्या सरकारबद्दल कसे बोलतात? असा थेट सवाल त्यांनी केला. जालना शीड पार्कला जागा मिळवून देण्याचे काम सुभाष देसाई यांनी केले होते याची आठवणही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी करून दिली.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.