AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक वारा सुटला… प्रचंड गडगडाट होताच एकच पळापळ… अर्ध्या महाराष्ट्रात धो धो…

Unseasonal Rain : आज सायंकाळी उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडून काढले. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक वारा सुटला... प्रचंड गडगडाट होताच एकच पळापळ... अर्ध्या महाराष्ट्रात धो धो...
rainImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 27, 2026 | 7:46 PM
Share

उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जळगावमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. आज सकाळपासून जळगावसह जिल्ह्याती ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक वारा सुटला आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची धांदल उडाली. जळगावसह धुळे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

धुळ्यात नागरिकांना झोडपले

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरामध्ये अवकाळी पावसाने लोकांना चांगलेच झोडपले. जवळपास अर्धा तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शिरपूर तालुक्यातील भाटपूरा परिसरात गारपीट झाली, यामुळे केळी, पपई आणि गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

नंदुरबारमध्ये मोठे नुकसान

नंदुरबार जिल्ह्यातही काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सातपुडा पट्ट्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसानीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी आंब्याच्या झाडांना मोहोर आला होता, मात्र आता हा मोहर जमिनीवर गळून पडला आहे. यामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, पपई आणि आंबा आणि इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

येवल्यात अवकाळी पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे आठवडे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तसेच नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अनेक गावात अचानक पावसाने हजेरी लावली. तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यावर या पावसाचा परिणाम होणार आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे लागवड केलेल्या कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बहिणाबाई महोत्सवातील बचत गटांच्या स्टॉलचे मोठे नुकसान

जळगावात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बहिणाबाई महोत्सवातील बचत गटांच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धा ते पाऊण तासापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे महोत्सवातील विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये पावसाचे पाणी साचले. त्यामुळे वस्तूंचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या मंडपाचे कापड फाटले. तसेच वॉटरप्रूफ मंडप नसल्याने पावसाचे पाणी थेट बचत गटांच्या स्टॉलमध्ये शिरले. एका बचत गटाचे सात ते दहा हजार रुपयापर्यंत नुकसान झाल्याची माहिती बचत गटाच्या विक्रेत्या महिलांनी दिली आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड