AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाची थेट अयोध्येत दखल, रामजन्मभूमीतील महंताची प्रतिक्रिया काय?

Ayodhya Acharya Satyendra Das on Jitendra Awhad Statement about Ram : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या विधानावर थेट अयोध्येतून प्रतिक्रिया आली आहे. रामजन्मभूमीतील महंतानी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी काय म्हटलं आहे? वाचा...

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाची थेट अयोध्येत दखल, रामजन्मभूमीतील महंताची प्रतिक्रिया काय?
| Updated on: Jan 04, 2024 | 11:49 AM
Share

अयोध्या, उत्तर प्रदेश | 04 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यावर अयोध्येतून प्रतिक्रिया आली आहे. राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळ खाल्ली हेच शास्त्रामध्ये लिहिलं आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे, असं आचार्य सत्तेंद्र दास यांनी म्हटलं आहे.

राम कदम यांचा थेट निशाणा

“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या घरी पूजा असेल तरी मांसाहार करणारा व्यक्ती मांसाहार करत नाही. मंदिरात जाताना माणसाने मांसाहार केला असेल तरी तो जाणं टाळतो. रामचंद्र मांसाहार करत असते तर त्यांना मांसाहार नैवेद्य दिला. त्यांच्या या वक्तव्याला कोणताही आधार नाही. वाल्मिकी रामायण, राम चरित्र मानस या कशातच असा उल्लेख नाही. ठराविक संप्रदायाने कसं खुश करता येईल याचं उत्तम उदाहरण ते देत आहेत, असं राम कदम म्हणालेत.

“आव्हाडांना शिक्षा झालीच पाहिजे”

जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा झाली पाहिजे. FIR दाखल झालाच पाहिजे. आव्हाड आस्तिक आहेत. आस्तिक असून रामचंद्रन नाराज करू नये. प्रमाण दाखवावं आणि दाखवणार नसतील तर माफी मागून स्वतःहून अटक व्हावं, असं राम कदम म्हणालेत.

सामनाचे पत्रकार, प्रवक्ते गप्प का? हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारायचा आहे. ही साधी घटना नाही. भव्य दिव्य मंदिर उभा राहत असताना शरद पवार कंपनी, राहुल गांधी कंपनी, उद्धव ठाकरे का नाराज आहेत?, असा थेट सवाल राम कदम यांनी केला आहे.

Follow Us
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?
राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?.
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?
खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 3 मंत्री, म्हणून अशोक खरातचा एन्काऊंटर?.
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला....
दादांच्या घातपाताचा कट? मुडदाही खोदून काढू; मुख्यमंत्र्यांनी घेतला.....