AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : दडी मारलेला मान्सून पुन्हा परतणार, येत्या 4 ते 5 दिवसांत सक्रिय होणार

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी राज्यात येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Weather Update : दडी मारलेला मान्सून पुन्हा परतणार, येत्या 4 ते 5 दिवसांत सक्रिय होणार
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 6:17 PM
Share

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी राज्यात येत्या चार ते पाच दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, पावसानं विश्रांती घेतल्यानं उकाडा वाढल्यानं नागरिक त्रस्त आहेत. तर पावसाचं प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याच आव्हान उभं राहिलंय.

के. एस. होसाळीकर यांचं ट्विट

प्रादेशकि हवामान केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.

वाशिममध्ये सोयाबीन करपू लागलं

वाशिम जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकासह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सावरत मशागत केल्याने सोयाबीन पिक चांगलं बहरले आहे.मात्र ऐन फुलं आणि शेंगा लागण्याच्या स्थितीत असताना गेल्या 15 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानं सोयाबीन पीक करपत आहे.त्यामुळं येत्या दोन तीन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट येणार आहे. जिल्ह्यात एकूण 4 लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 3 लाख हेक्टरवर सोयाबीनच पीक घेतलं जाते त्यामुळं पावसाने दगा दिला तर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात येणार आहे.

नंदूरबारमध्ये ऑक्टोबर हिटचा अनुभव श्रावण महिन्यात

नंदूरबार जिल्ह्यात श्रावण महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव जिल्ह्यात घेत आहेत. जिल्ह्यात तापमानाचा पारा चार अंशांनी वाढून 35 ते 36 अंशवर पोहोचला आहे. बाष्पयुक्त हवेमुळे पिकांवरही परिणाम होत असून सर्वत्र पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. श्रावणात पावसाच्या सरीचा अनुभव येतो मात्र नागरिक कडक उन्हाचां अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या दोन दिवसापासून तापमान वाढ झाली असून सरासरी 31 32 अंश असणाऱ्या तापमान 35.6 अंशापर्यंत गेले त्यामुळे उकाड्याने हैराण केले. वातावरणात बाष्पयुक्त हवा सुरू असल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे त्याचा परिणाम पिकावर होऊ लागला आहे. सध्या स्थिती काही शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी पेरणी केली आहे त्यामुळे अशा धोका निर्माण झाला आहे.

बारामतीत तापमान 32 अंशावर…

जून आणि जुलैमध्ये बारामती परिसरात थोड्या प्रमाणात पाऊस झाला. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून बारामती शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्रतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. ऐन पावसाळ्यात उन्हाची एवढी तीव्रता वाढली आहे की रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली आहे. आज बारामतीतील तापमान हे 32 अंशावर गेले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.या उन्हाच्या तीव्रतेने शेतातील उभी पिके देखील धोक्यात येणार आहेत. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाची वाट पाहत आहे.

इतर बातम्या:

राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो, बच्चू कडूंचं रोखठोक उत्तर

“छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्” आशिष शेलारांनी सीईटीवरुन ठाकरे सरकारला डिवचलं

Weather Forecast IMD predicted low and medium rain in Maharashtra next four and five days heat increased in various districts

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.