AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण…

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे.

थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण...
Yashwant Sugar & PowerImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 18, 2023 | 9:17 AM
Share

सांगली : यशवंत कारखान्याविरोधातील (Yashwant Sugar & Power) कामगार आंदोलकाचा मृत्यू झाल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. आज ७५ वा दिवस होता असं सहकारी सांगत आहेत. विट्यात सलग 72 दिवस ऊन वारा पाऊस झेलत आंदोलनास बसलेल्या यशवंत साखर कामगारांपैकी एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू (Death of agitator) झाला. अमृत यशवंत लोंढे (वय 65) (Amrut yashwant londhe) असे त्यांचे नाव असून येथील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांची तब्येत खालावत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सहकारी सांगत आहेत.

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन 2012 मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले.

त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण 8 कोटी 28 लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. जिल्हा बँक ह्या कामगारांचे पैसे गेले 20-12 वर्षे बिन व्याजी वापरत आहे. ते परत मिळावेत म्हणून 1 फेब्रुवारीपासून या कामगारांनी धरणे आंदोलन सुरु आहे. परवा गुरूवारी संध्याकाळी वाळूज येथील अमृत लोंढे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकारी आंदोलकांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले.

पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. अखेर लोंढे यांचा मृत्यू झाला. अमृत लोंढे यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. जिल्हा बँकेकडून त्यांना वेळेत पैसे मिळाले असते तर तर त्या कुटुंबावर ही वेळ आली नसती अशी लोकं चर्चा करीत आहेत.

Follow Us
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......