AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण…

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे.

थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण...
Yashwant Sugar & PowerImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 18, 2023 | 9:17 AM
Share

सांगली : यशवंत कारखान्याविरोधातील (Yashwant Sugar & Power) कामगार आंदोलकाचा मृत्यू झाल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. आज ७५ वा दिवस होता असं सहकारी सांगत आहेत. विट्यात सलग 72 दिवस ऊन वारा पाऊस झेलत आंदोलनास बसलेल्या यशवंत साखर कामगारांपैकी एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू (Death of agitator) झाला. अमृत यशवंत लोंढे (वय 65) (Amrut yashwant londhe) असे त्यांचे नाव असून येथील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांची तब्येत खालावत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सहकारी सांगत आहेत.

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन 2012 मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले.

त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण 8 कोटी 28 लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. जिल्हा बँक ह्या कामगारांचे पैसे गेले 20-12 वर्षे बिन व्याजी वापरत आहे. ते परत मिळावेत म्हणून 1 फेब्रुवारीपासून या कामगारांनी धरणे आंदोलन सुरु आहे. परवा गुरूवारी संध्याकाळी वाळूज येथील अमृत लोंढे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकारी आंदोलकांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले.

पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. अखेर लोंढे यांचा मृत्यू झाला. अमृत लोंढे यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. जिल्हा बँकेकडून त्यांना वेळेत पैसे मिळाले असते तर तर त्या कुटुंबावर ही वेळ आली नसती अशी लोकं चर्चा करीत आहेत.

Follow Us
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी.
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग.
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.