Video Valuable Companies List : यवतमाळच्या शेतकरी पुत्राची कमाल, ग्रामहित फोर्ब्सच्या 100 गुणवंत कंपन्यांच्या यादीत

यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबानी ग्रामहितचे सहकार्याने या पद्धतीचा लाभ घेतला आहे. अशी माहिती शेतकरी महिला सुरेखा नेवारे यांनी दिली.

Video Valuable Companies List : यवतमाळच्या शेतकरी पुत्राची कमाल, ग्रामहित फोर्ब्सच्या 100 गुणवंत कंपन्यांच्या यादीत
यवतमाळच्या शेतकरी पुत्राची कमाल, ग्रामहित फोर्ब्सच्या 100 गुणवंत कंपन्यांच्या यादीत
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 3:26 PM

यवतमाळ : जिल्ह्यातील वरुड तुका राहणाऱ्या शेतकरी पुत्राची कंपनी फोर्ब्सतर्फे जाहीर 100 गुणवंत कंपनीच्या यादीत (Companies List) आली. ग्रामहित (Gramhit ) ही शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार-चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देते. आता ही ग्रामहित कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे. जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडवण्याच्या उद्देशाने वस्तू अथवा सेवा पुरवितात, अशी ही स्टार्ट अप कंपनी आहे. फोर्ब्सचे (Forbes) यादीत स्थान मिळवणे ही अतिशय अवघड प्रक्रिया असते. फोर्ब्स अशा कंपन्यांची कामगिरी या निवडीच्या निमित्याने जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देते. यंदा या निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.

श्वेता-पंकज महल्ले शेतकरी जोडप्याचं स्टार्ट अप

पंकज महल्ले, श्वेता ठाकरे ( महल्ले) हे उच्च शिक्षित शेतकरी जोडपे ग्रामहितचे संस्थापक संचालक आहेत. कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते. शेतमाल विक्री सगळीकडेच एका अनिष्ट चक्रव्यूहात अडकलेली आहे. पिककाढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात. स्वाभाविकच व्यापारी वर्ग दर पाडतो. देणेकऱ्यांच्या दबावामुळे व्यवहार मोकळे करण्यासाठी शेतकरी मिळेल, त्या भावात माल विकून मोकळा होतो. असे होऊ नये यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, माल साठवणुकीची उत्तम, शास्त्रीय व्यवस्था. दुसरी म्हणजे साठवून ठेवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमीत कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता. शेतकऱ्याला माल विकायचा असल्यास घरूनच मोबाईलचे क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते. वारंवार बाजारपेठेत जाण्याची शेतकऱ्याला गरज पडत नाही. या दोन्ही तिन्ही बाबी शेतकऱ्याच्या गावात, परिसरात उपलब्ध असतील तर ते अधिकच चांगले ठरते.

कोण आहेत ग्रामहितचे संचालक

ग्रामहित नेमकी हीच व्यवस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. आजवर यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबानी ग्रामहितचे सहकार्याने या पद्धतीचा लाभ घेतला आहे. अशी माहिती शेतकरी महिला सुरेखा नेवारे यांनी दिली. पंकज यांनी स्थानिक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून आपले पदवी पातळीवरील ( BSW) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शेतीचे क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेऊन मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईमधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. काही वर्ष टाटाच्याच csr प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले. श्वेताने अभियांत्रिकी पदवीनंतर आयआयटी हैद्राबाद येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली. मात्र शेती नि शेतकऱ्यांची ओढ दोघांनाही गावाकडे घेऊन आली. त्यातूनच ग्रामहितचा शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.