BUDGET 2022: 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन; बजेटची ओपनिंग धडाकेबाज घोषणांनी!

| Updated on: Feb 01, 2022 | 12:29 PM

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात 400 नव्या वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. देशात येणाऱ्या काळात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

BUDGET 2022: 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन; बजेटची ओपनिंग धडाकेबाज घोषणांनी!
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केले.
Follow us on

नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी बरोब्बर 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प (CENTRAL BUDGET) सादर करायला सुरुवात केली. तब्बल 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी त्यांनी बजेटची ओपनिंग केली. मात्र, यासाठी निधी कसा आणि कुठून आणणार याचा उल्लेख त्यांनी भाषणात तरी केला नाही. मात्र, आगामी पाच राज्यांच्या निवडणुका पाहता या बजेटमध्येही असाच घोषणांचा धडाका राहू शकतो. अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाल्या की, कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. मात्र, तरीरी जीडीपी 9.2 टक्के राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शिवाय आपल्या अर्थसंकल्पात येत्या पंचवीस वर्षांची ब्लू प्रिंट असेल, असा आशावादही त्यांनी केला.

60 लाख नव्या नोकऱ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. विशेषतः या बजेटमधून सामान्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न असेल. येणाऱ्या काळात लवकरच LIC चा IPO बाजारात आणला जाणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र, या नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात असतील, त्यांच्यासाठी निधी कसा उपलब्ध असेल, याचा उल्लेख भाषणात नव्हता. कदाचित अर्थसंकल्पात याचा सविस्तर उल्लेख असू शकतो.

8 ठिकाणी रोप वे

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात 400 नव्या वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. यामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोठ्या शहरात गरज ओळखून मेट्रो तयार केल्या जातील. स्थानिक व्यापाराला महत्त्व दिले जाईल. अनेक ठिकाणी मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. त्यासाठी वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणू, असे त्या म्हणाल्या. छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. 2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरू करण्यात येईल तसेच रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.

-निर्मला सीतारमण, अर्थमंत्री

इतर बातम्याः

अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प आज होणार सादर, कुठल्या क्षेत्राला मिळणार दिलासा याकडे सर्वांचे लक्ष…

Budget 2022 : मनमोहन Vs मोदी सरकार, कोणाच्या काळात करदात्याला दिलासा, कोणामुळे रिकामा झाला खिसा?