AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Konkan Ganeshotsav | कोकणबाबत प्रशासन-मंत्र्यांमध्ये चर्चा, अन्य कोणाला निमंत्रण नाही, अनिल परबांचं राणेंना उत्तर

गणेशोत्सवानिमित्त कोकणात प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.

Konkan Ganeshotsav | कोकणबाबत प्रशासन-मंत्र्यांमध्ये चर्चा, अन्य कोणाला निमंत्रण नाही, अनिल परबांचं राणेंना उत्तर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 14, 2020 | 4:22 PM
Share

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात प्रवास करण्याची परवानगी (Nitesh Rane Vs Anil Parab) देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला आमंत्रण न दिल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. ‘गणेश चतुर्थीसाठी बोलावलेली बैठक ही फक्त शिवसेनेची आहे का’, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. तर, ‘आम्ही कोणाला निमंत्रण पाठवले नव्हते’, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी नितेश राणेंना उत्तर दिलं आहे (Nitesh Rane Vs Anil Parab).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नेमकं प्रकरण काय?

कोकणातील गणेशोत्सवासाठी प्रवासाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्त्वात बैठक पार पडली. या बैठकीला राणे कुटुंबीयांनी आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यावरुन नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘सर्वपक्षीयांना निमंत्रण का नाही? एकतर्फी चर्चा करुन लोकांवर नियम का लादत आहेत?, असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले. याबाबत ट्विट करत नितेश राणेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

नितेश राणे काय म्हणाले?

“परिवहन मंत्र्यांनी गणेश चतुर्थीसाठी बोलावलेली बैठक ही फक्त शिवसेनेची आहे का? बैठकीचं आमंत्रण नाही किंवा माहितीही नाही! असे नियोजन करुन कोणाचा फायदा होणार आहे? कोकणचं अजून किती नुकसान करणार हे सरकार?, असं ट्विट नितेश राणेंनी केलं (Nitesh Rane Vs Anil Parab).

अनिल परब यांचं नितेश राणेंना उत्तर

“ही बैठक फक्त शिवसेनेची नव्हती, तर तिथे राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. प्रशासनासोबत मंत्र्यांची चर्चा होती. या बैठकीसाठी आम्ही कोणाला निमंत्रण पाठवले नव्हते”, असं म्हणत अनिल परब यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं.

“या बैठकीत आम्ही कोकणातील कोरोना परस्थितीचा आढावा घेतला. चाकरमान्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देऊन त्यावर निर्णय घेऊ. चाकरमान्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

बैठकीत काय ठरलं?

“कोकणातील लोकप्रतिनिधींबरोबर बैठक झाली. सगळ्यांची मते जाणून घेतली. मुंबईवरुन जाणारे लोक गावाला कसे जाणार, क्वारंटाईन कसे करायचं?, सगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. याचा सारांश मुख्यमंत्र्यांना देणार, मग ते यावर निर्णय घेतील”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

“जे निकष आहेत, ज्या गाईडलाईन्स आहेत ते जिल्हाधिकारी ठरवतात. ज्यांना प्रवास करायची परवानगी मिळेल, त्यांना बसेसही मिळतील”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

“महत्वाचं म्हणजे ज्यांची घर बंद आहे, अशा लोकांना नियम आणि अटी काय असणार? पासेस व्यवस्था याची चर्चा बैठकीत झाली. ज्यांना जायचं आहे, त्यांना पाठवलं पाहिजे. अटींचा विचार करुन पाठवलं पाहिजे. कोकणात गणपतीसाठी ज्यांना जायचं आहे. त्यासाठी नियम आणि अटी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर ठरवू”, असंही त्यांनी सांगितल.

“आम्हाला कोकणातील लोकांच्या जीवाची पण काळजी आहे. चक्रीवादळामुळे कोकणात अनेक ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे. गणपती आधी वीज पुरवठा सगळीकडे सुरळीत होईल”, असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले.

मंत्रालयातील नव्या प्रशासकीय इमारतीत ही बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे, शिवसेना आमदार योगेश कदम, रमेश लटके, भरत गोगावले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हे सर्व उपस्थित होते. तसेच, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इतर काही आमदारही या बैठकीत सहभागी झाले होते.

Nitesh Rane Vs Anil Parab

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही, केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा

बाळासाहेब क्राऊड पूलर होते, हे पवारही मानत, पण संजय राऊतांनी ‘ब्रॅण्ड ठाकरे’ची ओळख पुसली : नितेश राणे

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...