AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

220 बैठका, 60 शहरे, 1.5 कोटी लोकांचा सहभाग, G20 मुळे अशी बदलणार देशाची अर्थव्यवस्था

G-20 Meeting : जी20 मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी चालणा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी२० च्या अनेक बैठका वेगवेगळ्या राज्यांमध्ये आयोजिक केल्या होत्या.

220 बैठका, 60 शहरे, 1.5 कोटी लोकांचा सहभाग, G20 मुळे अशी बदलणार देशाची अर्थव्यवस्था
G20 Summit
| Updated on: Sep 07, 2023 | 10:23 AM
Share

नवी दिल्ली : G20 बैठकीसाठी येणाऱ्या जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज आहे. रस्ते, चौक आणि उद्याने ते भारत मंडपम या मुख्य स्थळापर्यंत संपूर्ण देश उत्सवाच्या मूडमध्ये आहे. कृष्ण जन्माष्टमीसारख्या शुभ मुहूर्तावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेते भारतात पोहोचू लागले आहेत. पण G20 हा केवळ या 5 दिवसांचा उत्सव नाही. कारण गेल्या एका वर्षापासून भारताला अध्यक्षपद मिळाल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेतही बदल झाला आहे.

भारताने G20 चे अध्यक्षपद हे जागतिक स्तरावर आपली आर्थिक शक्ती तसेच सॉफ्ट पॉवरचे प्रदर्शन करण्याचे साधन बनवले आहे. म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यात G20 शी संबंधित सुमारे 220 बैठका आयोजित करण्यात आल्या. यामध्ये देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 60 शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि जगातील विविध देशांतील पाहुण्यांनी भारत पाहिला.

पंतप्रधान मोदींनी जगाला ‘भारत’ दाखवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 कार्यक्रमाला भारतातील प्रत्येक राज्याशी जोडले आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर भारताच्या ‘विविधतेतील एकता’ संस्कृतीची ओळख जगाला करून दिली आहे. अलीकडेच, जेव्हा G20 अंतर्गत डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रिस्तरीय बैठक बंगळुरूमध्ये झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ‘डिजिटल इकॉनॉमी’ वर चर्चा करण्यासाठी बंगळुरूपेक्षा चांगली जागा असू शकत नाही.

त्याचप्रमाणे जी-20 च्या सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक वाराणसीमध्ये झाली, ज्याची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे, ज्याला जगातील सर्वात जुन्या सांस्कृतिक केंद्राचा दर्जा आहे. यावेळी भारताने जम्मू-काश्मीरपासून ते त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशपर्यंत जगाला दाखवून दिले. त्याचबरोबर गांधीनगर, जयपूर ते गंगटोक आणि इटानगरच्या संस्कृतीचीही ओळख त्यांना झाली.

सांस्कृतिक समृद्धी दाखवण्यावर भर

पीटीआयला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी G20 संदर्भात चर्चा केली तेव्हा त्यांनी त्यांना केवळ त्यांच्या संबंधित प्रदेशातील सांस्कृतिक वारसा दाखविण्यास सांगितले. त्याऐवजी, आपल्या राज्यात पोहोचणाऱ्या G20 च्या प्रतिनिधींच्या सतत संपर्कात राहावे, जेणेकरून भविष्यात आणखी अनेक संधी निर्माण करता येतील.

G20 च्या एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची बैठक इंदूर, मध्य प्रदेश येथे झाली. ती पूर्णपणे ‘झिरो वेस्ट’ बैठक होती. येथे प्लास्टिकच्या बाटल्या आणण्यास मनाई होती. लेखनासाठी वापरलेले पॅड पुन्हा वापरता येण्याजोग्या कागदाचे बनलेले होते. भारताच्या ‘स्वच्छ भारत’ उपक्रमाचे प्रदर्शन करण्याचा हा एक मार्ग होता.  गेल्या ६ वर्षांपासून इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर राहिले आहे.

तसेच G20 ची जागतिक व्यापार बैठक जयपूर येथे झाली, तर गोव्यात 9 बैठका झाल्या. अशाप्रकारे मोदी सरकारने या कार्यक्रमाला देशातील विविध क्षेत्रांतील चांगल्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे काम केले. पंतप्रधानांच्या या उपक्रमाबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, हे सरकार वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. एक प्रकारे पंतप्रधान मोदींना ‘मुत्सद्देगिरीचे लोकशाहीकरण’ करायचे होते. संपूर्ण देशाला आपण G20 मध्ये सहभागी होत आहोत असे वाटावे अशी त्यांची इच्छा होती.

दीड कोटी लोकांना लाभ झाला

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, विविध शहरांमध्ये होणाऱ्या जी-20 बैठकींमध्ये सुमारे 1.5 कोटी लोकांनी या ना त्या मार्गाने संबंधित कामात भाग घेतला. एवढ्या मोठ्या पातळीच्या कार्यक्रमाशी निगडीत राहिल्याने त्यांच्यात एक वेगळाच स्वाभिमान निर्माण होतो. नॉन-मेट्रो शहरांतील लोकांना हा अनुभव पूर्वी मिळत नव्हता.

या बैठकांमध्ये 125 राष्ट्रांतील 1 लाखाहून अधिक लोकांनी भारताचे विविध भाग पाहिले. याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर, ज्या शहरांवर आणि राज्यांवर हे प्रतिनिधी गेले त्यांवर झाला. या सर्व संधी पर्यटनातून उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.