AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 लोकसंख्या असलेलं गाव, आजही चूल पेटत नाही, मग कसे जेवण बनते? जाणून थक्क व्हाल!

भारतात एक गाव असे आहे जिथे केवळ 500 लोक राहतात. पण या गावातील घरांमध्ये जेवण बनवले जात नाही. गावच्या सरपंचाने अनोखी शक्कल लढवल्यामुळे सध्या हे गाव चर्चेत आले आहे.

500 लोकसंख्या असलेलं गाव, आजही चूल पेटत नाही, मग कसे जेवण बनते? जाणून थक्क व्हाल!
VillageImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 14, 2025 | 3:46 PM
Share

वृद्धापकाळ हा असा काळ असतो जेव्हा आजुबाजूच्या लोकांची सर्वात जास्त गरज असते. आजच्या वेगवान जीवनात न्यूक्लियर फॅमिली आणि मोठ्या शहरांमध्ये एकटे राहणे सामान्य झाले असताना, भारतातील एका गावाने अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे त्याला आदर्श गाव असे म्हटले जात आहे. जिथे लोक न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहत आहेत आणि चांगल्या संधी व जीवनाच्या शोधात शहरांकडे जात आहेत, तिथे हे गाव अनोखी पद्धत आंमलात आणत आहे. आम्ही बोलतोय गुजरातच्या चंदनकी गावाबद्दल, जिथे आजही कोणीही घरी जेवण बनवत नाही. जाणून घ्या नक्की ही परंपरा कशी सुरू झाली आणि लोक ती कशी पाळतात.

गावात राहतात ५०० लोक

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील चंदनकी गावात कोणीही घरी जेवण बनवत नाही. ही परंपरा वृद्धांच्या वाढत्या एकाकीपणाच्या समस्येचे निराकरण म्हणून सुरू झाली होती. अनेक तरुण शहर किंवा परदेशात गेल्यामुळे, जिथे पूर्वी १,१०० लोक राहत होते, त्या गावात आता सुमारे ५०० लोक राहतात, त्यापैकी बहुतेक वृद्ध आहेत. चंदनकीच्या कम्युनिटी किचनमध्ये सर्वांचे जेवण बनते, गावातील एका खास जागी हे सारे घडते. जेवण बनवण्याची एक सामायिक जागा असल्यामुळे हे किचन पूर्ण समुदायात एकता आणि आधाराची भावना आणते. गावकरी प्रति व्यक्ती दरमहा २,००० रुपये देतात आणि आजच्या काळात ही रक्कम पोटभर जेवणासाठी अगदी छोटी आहे. हे जेवण भाड्याने ठेवलेले स्वयंपाकी बनवतात, ज्यांना दरमहा ११,००० रुपये पगार मिळतो.

सरपंचाने लढवली शक्कल

किचनमध्ये विविध पारंपरिक गुजराती पदार्थ मिळतात, ज्यामुळे पोषणाचे संतुलन आणि विविधता दोन्ही टिकून राहते. गावाच्या सरपंच पूनमभाई पटेल यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूयॉर्कमध्ये २० वर्षे घालवल्यानंतर ते अहमदाबादचे घर सोडून चंदनकी येथे परत आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे समुदायाची भावना टिकवून ठेवण्यात मोठी मदत झाली. ते म्हणाले, ‘आमचे चंदनकी असे गाव आहे जे एकमेकांसाठी जगते.’ जेवण सोलर पॉवरच्या एअर-कंडिशन्ड हॉलमध्ये वाढले जाते, जो गावकऱ्यांसाठी भेटण्याची जागा बनला आहे. हा हॉल फक्त जेवणाची जागा नाही तर अशी जागा आहे जिथे लोक आपल्या आनंद आणि दुःखाची देवाणघेवाण करतात. यामुळे गावकऱ्यांमध्ये मजबूत नाते निर्माण झाले असून त्यांना एकटेपणा जाणवत नाही.

सुरुवातीला विचार विचित्र वाटला होता

त्यांनी सांगितले की कम्युनिटी किचनचा विचार सुरुवातीला लोकांना विचित्र वाटला होता. पण जसे-जसे त्याचे फायदे समोर आले, तसे अधिकाधिक गावकऱ्यांनी तो स्वीकारला. या किचनने केवळ एकटेपणाचे निराकरण केले नाही तर वृद्धांना जेवणाची काळजी न करण्याचे आश्वासनही दिले. यामुळे त्यांना विश्रांती घेण्यास आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जास्त वेळ मिळाला. कम्युनिटी किचनने गुजरातच नव्हे तर गावाबाहेरही लोकांचे लक्ष वेधले आहे.

आसपासच्या भागातून लोक हे अनोखे सेटअप पाहण्यासाठी चंदनकीला येतात. हे इतर गावांसाठी एक मॉडेल बनले आहे जे अशाच समस्यांना तोंड देत आहेत. चंदनकीच्या कम्युनिटी किचनची यशस्विता त्यांच्या साधेपणात आणि त्यातून निर्माण झालेल्या मजबूत सामुदायिक भावनेत आहे. गावात राहणाऱ्यांच्या आरोग्यावरही याचा चांगला परिणाम झाला आहे. नियमित, पौष्टिक जेवण मिळाल्याने गावकऱ्यांच्या आरोग्यात सुधार झाला आहे. एकत्र जेवल्याने सामाजिक संवादही वाढला असून वृद्धांमध्ये एकटेपणाची भावना कमी झाली आहे.

कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.