मुंबईः देशातील फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच संपली आहे. त्यानंतर 5G सेवा (5G Service) नागरिकांच्या वापरासाठी कधी उपलब्ध होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता फाईव्ह जी सेवा लवकच नागरिकांना उपलब्द होणार आहे. देशभर 12 ऑक्टोंबरपासून (12 October) फाईव्ह जी सेवा सुरु होत आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशभरात 5G सेवेचा लक्षणीय विस्तार होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच, आता या कंपन्यांकडे स्पेक्ट्रमची कमतरता भासणार नसल्यामुळे या सेवेचा दर्जा सुधारणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 13 महानगरांचा समावेश केला जाणार असून त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांचा समावेश आहे.
आज देश के गांव- गांव में optical fibre बिछाने का काम तेज़ गति से चल रहा है। अब भारत में 5G launch हो रहा है और इस दशक के अंत तक हम 6G launch करने की तैयारी कर रहे हैं : पीएम @narendramodi जी pic.twitter.com/iNnyXvs1ZG
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 25, 2022
देशात 12 ऑक्टोंबरपासून फाईव्ह-जी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय तंत्रज्ज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.
एकदा फाईव्ह-जी सेवा देशात सुरू झाली की, नंतर टप्प्याटप्याने या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पहिल्या टप्प्यात देशातील 13 महानगरांचा समावेश केला जाणार असून त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांचा समावेश आहे. यामध्ये अहमदाबाद, बंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश असणार आहे.
केंद्र सरकारकडून फाईव्ह जी सेवा सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर ही सेवा देणार कोण असाही सवाल उपस्थित करण्यात येत होता, त्यामुळे ही राज्यात फाईव्ह जी सेवा जाहीर केली गेली असून ही सेवा आता जिओकडूनकडून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिओकडूनच देशात प्रथम 5G सेवा सुरू करण्यात येऊ शकते असंही सांगण्यात आले आहे. Airtel,Vodafone-Idea या तिन्ही कंपन्यांचे 5G नेटवर्क पूर्णपणे तयार असून यासोबतच तिन्ही कंपन्यांनी 5G चाचण्यादेखील पूर्ण केल्या असल्याचे सागंण्यात आले आहे.