AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लाल फुलाचे पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित

जास्वंदीचे फुलं औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात आणि त्यांचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे प्रदान होतात. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की याचे पाणी कसे बनवायचे? आणि त्यांचे आरोग्य फायदे कोणते आहेत.

'या' लाल फुलाचे पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित
jaswandi flowerImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 12:46 AM
Share

जास्वंदीचे फूल केवळ दिसायलाच सुंदर नाही तर त्यात अनेक प्रभावी औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदात ते अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. अशातच तुम्हाला जर तुम्हाला शरीरकदृष्टया तंदुरस्त राहायचे असेल तर जास्वंदीच्या फुलाचे पाणी अनेक आरोग्य फायदे प्रदान करते, जसे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, त्वचेचा रंग सुधारणे आणि मासिक पाळीच्या समस्यांपासून मुक्तता मिळणे. चला तर मग आजच्या लेखात आपण जास्वंदीच्या फुलाचे फायदे आणि याचे पाणी कसे तयार करायचे ते जाणून घेऊयात.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

जास्वंदीच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

त्वचा चमकदार बनवते

जास्वंदीचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. तसेच मुरुम आणि त्वचेच्या ॲलर्जी कमी करण्यास देखील मदत करते.

केसांचे आरोग्य सुधारते

जास्वंदीच्या पाण्याच्या सेवनाने केसांच्या मुळांना पोषण मिळते, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि त्यांना नैसर्गिक चमक मिळते.

रक्तातील साखर नियंत्रित करते

हे पाणी मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण ते रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित करण्यास मदत करते.

मासिक पाळीच्या अनियमिततेमध्ये फायदेशीर

महिलांमध्ये अनियमित किंवा वेदनादायक मासिक पाळी कमी करण्यास जास्वंदीचे पाणी मदत करू शकते. ते हार्मोनल संतुलन सुधारते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

हे पाणी चयापचय गतिमान करते आणि फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पचन सुधारते

गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे पाणी प्रभावी आहे. ते दररोज प्यायल्याने तुमचे पोट स्वच्छ राहण्यास मदत होते.

जास्वंदीच्या फुलांचे पाणी कसे बनवायचे?

2 ते 3 ताजी लाल जास्वंदीची फुले धुवून घ्या. एका पॅनमध्ये 2 कप पाणी घेऊन त्यात ही फुले टाका.

पाणी गुलाबी किंवा लाल होईपर्यंत 5 ते 7 मिनिटे उकळवा.

नंतर हे पाणी गाळून त्यात मध किंवा लिंबाचा रस मिक्स करून सेवन करा.

सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे अधिक फायदेशीर आहे. जास्वंदाचे पाणी नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करते आणि ते नियमितपणे प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.