AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गोष्टी घरातील सकारात्मक ऊर्जा वाळवीसारख्या खातात, आत्ताच काढून टाका घराबाहेर

बऱ्याच वेळा जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे एखादी व्यक्ती घरात अशा गोष्टी ठेवते ज्यांचा नकारात्मक परिणाम घरात होतो. तर या वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात, जी हळूहळू वाळवीसारखी सकारात्मक उर्जेला खाऊन टाकते. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरातून बाहेर काढुन टाकल्या पाहिजेत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

'या' गोष्टी घरातील सकारात्मक ऊर्जा वाळवीसारख्या खातात, आत्ताच काढून टाका घराबाहेर
Vastu TipsImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Jan 02, 2026 | 10:29 AM
Share

घर म्हणजे केवळ विटा आणि दगडांच्या भिंतींची रचलेलं घर नाही तर ते एक मंदिर आहे. वास्तुशास्त्रात घराला खूप खास महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले आहे की घर हे आनंद, शांती आणि समृद्धीचे केंद्र आहे. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असणे महत्त्वाचे मानले जाते. कारण सकारात्मक घराचे वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते आणि केवळ सकारात्मक ऊर्जाच सकारात्मक वातावरण राखू शकते.

तथापि कधीकधी आपल्याकडून जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे घरात अशा गोष्टी ठेवल्या जातात ज्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या घराच्या सकारात्मकतेवर होतो. या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात, जी हळूहळू सकारात्मक उर्जेला वाळवीसारखी खाऊन टाकते. घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असताना, मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि परस्पर संघर्ष वाढतात. तर घरात नकारात्मकतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींचा कोणत्या आहेत ज्या घराबाहेर काढल्या पाहिजे ते जाणून घेऊयात.

या गोष्टी घरात ठेवू नका तुटलेली भांडी

वास्तुशास्त्रानुसार तुटलेली भांडी कधीही घरात ठेवू नयेत आणि ती रोजच्या वापरात चुकूनही वापरू नयेत. वास्तुनूसार तुटलेली भांडी घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या वस्तू नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानल्या जातात. यामुळे घरात संघर्ष आणि आर्थिक नुकसान वाढते, म्हणून तुटलेली भांडी ताबडतोब घराबाहेर काढावीत.

नकारात्मक फोटो

आपल्यापैकी अनेकांना घरात वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो लावायला आवडतात. पण घरात कधीही चुकूनही रडणे, युद्ध, हिंसाचार किंवा दुःख दर्शविणारी फोटो लावू नका. अशा प्रतिमा मानसिक ताण वाढवतात.

निरुपयोगी वस्तू

घराची दररोज स्वच्छता करावी. शिवाय महिन्यातून एकदा तरी घर पूर्णपणे स्वच्छ करावे. या स्वच्छता दरम्यान वापरात नसलेल्या वस्तू टाकून द्या. वापरात नसलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात.

तुटलेले घड्याळ

घड्याळ हे काळाचे आणि जीवनाच्या गतीचे प्रतीक आहे. घरात बंद पडलेलं किंवा तुटलेले घड्याळ हे थांबलेली प्रगती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे, म्हणून असे म्हटले जाते की तुटलेले घड्याळ ताबडतोब दुरुस्त करावे किंवा फेकून द्यावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण