AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्य भूमिकेत फ्लॉप ठरली, कधी बनली हुशार सून तर कधी रागीट वहिनी, पण त्या कारणामुळे इंडस्ट्रीपासून राहतेय दूर

कधी हुशार सून तर कधी रागीट वहिनीची भूमिका पण मुख्य भूमिकेत या अभिनेत्रीला मिळाले नाही यश. नव्या चित्रपटांमुळे अभिनेत्रीने इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय.

मुख्य भूमिकेत फ्लॉप ठरली, कधी बनली हुशार सून तर कधी रागीट वहिनी, पण त्या कारणामुळे  इंडस्ट्रीपासून राहतेय दूर
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 16, 2026 | 8:01 AM
Share

Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टी काळानुसार सतत बदलत गेली. कथानकांची मांडणी बदलली, व्यक्तिरेखांची व्याख्या बदलली आणि प्रेक्षकांची आवडही नव्याने घडत गेली. मात्र या बदलांच्या प्रवाहात काही कलाकारांनी स्वतःला त्या शर्यतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवणे पसंत केले. त्यापैकीच एक नाव म्हणजे शोमा आनंद. आपल्या काळात लोकप्रियता आणि यश अनुभवलेल्या या अभिनेत्रीला नव्या सिनेमाच्या बदलत्या स्वरूपाशी पूर्णपणे जुळवून घेता आले नाही.

16 फेब्रुवारी 1958 रोजी मुंबईत जन्मलेल्या शोमा आनंद यांनी 70 आणि 80 च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनयाची सुरुवात करताच त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या. त्या दिवंगत अभिनेते Rishi Kapoor यांच्यासोबतही झळकल्या. ज्यामुळे त्यांना इंडस्ट्रीत अधिक बळ मिळाले. पुढे अनेक नामांकित कलाकारांसोबत काम करत त्यांनी विश्वासार्ह अभिनेत्री म्हणून आपली छाप पाडली.

‘नवा सिनेमा’ न रुचल्याची स्पष्ट कबुली

दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडू लागला. अ‍ॅक्शनप्रधान कथा, वेगवान संपादनशैली आणि ठळक विषय वाढू लागले. या नव्या प्रवाहाशी आपली अभिनयशैली जुळत नसल्याची जाणीव शोमा आनंद यांनी व्यक्त केली आणि त्यांनी हळूहळू चित्रपटांपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, नव्या चित्रपटांमध्ये भावनिक खोली कमी होत चालली असून केवळ गोंधळ आणि आक्रस्ताळेपणा वाढला आहे. आपल्या मनाला भावणाऱ्या आणि भावनिक नातं जुळवणाऱ्या प्रकल्पांनाच प्राधान्य देण्याचा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे मनापासून जोडल्या न जाणाऱ्या कामांचा भाग होण्यापेक्षा त्यांनी मागे हटणे पसंत केले.

वैयक्तिक आयुष्यातील चढउतार

वैयक्तिक आयुष्यातही शोमा आनंद यांनी अनेक चढउतार अनुभवले. त्यांनी दिग्दर्शक-अभिनेता Tariq Shah यांच्याशी विवाह केला होता. 2021 मध्ये त्यांच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला. या कठीण काळानंतर त्यांनी कुटुंब आणि मुलगी सारा शाहसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य दिले आणि अभिनयापासून काही प्रमाणात दूर राहणे पसंत केले.

आज शोमा आनंद पडद्यावर कमी दिसत असल्या तरी त्यांची भूमिका आणि विचार आजही लक्षात राहतात. बदलत्या सिनेमाच्या शर्यतीत स्वतःला हरवण्यापेक्षा आपल्या संवेदनशीलतेची आणि ओळखीची जपणूक करणे त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.