AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवामानात मोठा बदल, पुढील 24 तास महत्त्वाचे, कोणत्या शहराला बसणार सर्वाधिक झळा

महाराष्ट्रातील हवामानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. अशातच आता पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने मोठा अलर्ट दिला आहे.

हवामानात मोठा बदल, पुढील 24 तास महत्त्वाचे, कोणत्या शहराला बसणार सर्वाधिक झळा
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 16, 2026 | 7:24 AM
Share

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात होळीपूर्वीच उन्हाचा कडाका वाढू लागला असून ठाणे जिल्हा आणि परिसरात तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. हवामानातील अचानक बदल आणि उष्ण, कोरड्या व दमट वातावरणामुळे काही भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी दिवसभर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही दिवस तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

ठाणे जिल्ह्यात अधिक तापमान

ठाणे जिल्ह्यात आज आकाश मुख्यत्वे स्वच्छ राहणार असून उष्णतेचा प्रभाव ठळकपणे जाणवेल. किमान तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

कल्याण-डोंबिवली परिसरात हवामान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. दिवसभर ऊन आणि मध्यम प्रमाणात आर्द्रता असल्याने उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो.

इतर ठिकाणी कसं असेल तापमान?

ग्रामीण भागातही उष्ण व दमट वातावरण कायम राहील. येथे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. सकाळी आणि रात्री किंचित गारवा जाणवेल; मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका अधिक असेल.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. पुरेशा प्रमाणात पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यामुळे पुढील काही दिवस उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा