AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवामानात मोठा बदल, पुढील 24 तास महत्त्वाचे, कोणत्या शहराला बसणार सर्वाधिक झळा

महाराष्ट्रातील हवामानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. अशातच आता पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने मोठा अलर्ट दिला आहे.

हवामानात मोठा बदल, पुढील 24 तास महत्त्वाचे, कोणत्या शहराला बसणार सर्वाधिक झळा
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 16, 2026 | 7:24 AM
Share

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात होळीपूर्वीच उन्हाचा कडाका वाढू लागला असून ठाणे जिल्हा आणि परिसरात तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. हवामानातील अचानक बदल आणि उष्ण, कोरड्या व दमट वातावरणामुळे काही भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी दिवसभर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही दिवस तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

ठाणे जिल्ह्यात अधिक तापमान

ठाणे जिल्ह्यात आज आकाश मुख्यत्वे स्वच्छ राहणार असून उष्णतेचा प्रभाव ठळकपणे जाणवेल. किमान तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

कल्याण-डोंबिवली परिसरात हवामान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. दिवसभर ऊन आणि मध्यम प्रमाणात आर्द्रता असल्याने उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो.

इतर ठिकाणी कसं असेल तापमान?

ग्रामीण भागातही उष्ण व दमट वातावरण कायम राहील. येथे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. सकाळी आणि रात्री किंचित गारवा जाणवेल; मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका अधिक असेल.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. पुरेशा प्रमाणात पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यामुळे पुढील काही दिवस उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.