AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हवामानात मोठा बदल, पुढील 24 तास महत्त्वाचे, कोणत्या शहराला बसणार सर्वाधिक झळा

महाराष्ट्रातील हवामानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. अशातच आता पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने मोठा अलर्ट दिला आहे.

हवामानात मोठा बदल, पुढील 24 तास महत्त्वाचे, कोणत्या शहराला बसणार सर्वाधिक झळा
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 16, 2026 | 7:24 AM
Share

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात होळीपूर्वीच उन्हाचा कडाका वाढू लागला असून ठाणे जिल्हा आणि परिसरात तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे. हवामानातील अचानक बदल आणि उष्ण, कोरड्या व दमट वातावरणामुळे काही भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी दिवसभर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात पुढील काही दिवस तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

ठाणे जिल्ह्यात अधिक तापमान

ठाणे जिल्ह्यात आज आकाश मुख्यत्वे स्वच्छ राहणार असून उष्णतेचा प्रभाव ठळकपणे जाणवेल. किमान तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो.

कल्याण-डोंबिवली परिसरात हवामान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. दिवसभर ऊन आणि मध्यम प्रमाणात आर्द्रता असल्याने उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो.

इतर ठिकाणी कसं असेल तापमान?

ग्रामीण भागातही उष्ण व दमट वातावरण कायम राहील. येथे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. सकाळी आणि रात्री किंचित गारवा जाणवेल; मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका अधिक असेल.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. पुरेशा प्रमाणात पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यामुळे पुढील काही दिवस उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?