AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तामिळनाडूत एअर इंडियाच्या विमानात हवेत तांत्रिक बिघाड, प्लेनच्या बराच वेळ हवेतच चकरा, अखेर…

तामिळनाडू येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत होतं. अखेर या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात यश आलं आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूत एअर इंडियाच्या विमानात हवेत तांत्रिक बिघाड, प्लेनच्या बराच वेळ हवेतच चकरा, अखेर...
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 11, 2024 | 8:47 PM
Share

तामिळनाडू येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत होतं. या विमानात हायड्रोलिक फेल झालं होतं. त्यामुळे विमानाचे चाकं आतमध्ये जाण्यास अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी विमानातील इंधन कमी केलं जात होतं. त्यासाठी विमानाला हवेतच फिरवलं जात होतं. विमानातील झालेल्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर त्रिची विमानतळावर प्रशासन सज्ज झालं. त्रिची विमानतळावर जवळपास 20 पेक्षा जास्त रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. या विमानात 141 प्रवासी होते. अखेर या विमानाची आता इमर्जन्सी लँडिंग करण्यात यश आलं आहे.

विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याची चाके आतमध्ये गेली नाहीत. चाकं आतमध्ये जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे विमानाला पुढील ऑपरेशनल समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानातील इंधन संपवून उतरविण्याची योजना आखली. इंधनाने भरलेल्या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगवेळी अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंधन संपवून विमानाची सुखरुप लँडिंग करण्यात आली. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची माहिती मिळाल्यानंतर अनेक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही विमानतळावर तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, विमान विमानतळावर सुखरूप उतरले ही दिलासादायक बाब आहे.

नेमकं काय घडलं?

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी त्रिची विमानतळाहून उड्डाण केलं होतं. हे विमान शारजाहला जात होतं. टेक ऑफनंतर विमानाचे चाकं मोडून आतमध्ये घेणारं हायड्रॉलिक फेल झालं. त्यानंतर पायलटने तातडीने याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाला दिली. यावेळी निर्णय घेण्यात आला की, जोपर्यंत विमानातील पूर्ण इंधन संपत नाही, फक्त लँडिंग करण्याइतपत इंधन शिल्लक राहत नाही तोपर्यंत विमानाला हवेतच ठेवावं. त्यामुळे विमान बराच वेळ आकाशात फिरत राहिलं. अखेर विमानातील इंधन कमी झाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेण्यात आला.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट