AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समता पक्षाला खतपाणी कोण घालतंय? निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट ठेवत अनिल देसाई यांचा रोख कुणावर ?

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणीचा दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यापूर्वीचा युक्तिवाद पाहता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

समता पक्षाला खतपाणी कोण घालतंय? निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट ठेवत अनिल देसाई यांचा रोख कुणावर ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 23, 2023 | 10:44 AM
Share

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल ( Adv Kapil Sibbal ) यांनी जवळपास दोन दिवस युक्तिवाद केला आहे. त्यानंतर आज पुन्हा तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. यामध्ये वकिल अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद होणार आहे. याच दरम्यान ठाकरे गटाकडे मशाल चिन्ह आहे, त्यावर समता पक्षानेही दावा केला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी एक भर पडणार आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई ( Anil Desai ) यांनी भाजपला नाव न घेता टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणीचा दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यापूर्वीचा युक्तिवाद पाहता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

त्याच दरम्यान ही सुनावणी पुढील आठवड्यातही होणार असल्याचा अंदाज ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी लावला आहे. आजचा दिवसही ठाकरे गटाचा युक्तिवाद करण्यासाठीच असल्याचे म्हंटले आहे.

तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पाहता मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यन्त निकाल येणं अपेक्षित असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी म्हंटले आहे. याशिवाय याच काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

याच मशाल चिन्हावर समता पक्षानेही आपला दावा सांगितला आहे. त्या विरोधात समता पक्ष न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढणार असल्याने अनिल देसाई यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

समता पक्षाला कोण बळ देत आहे ? कोणती महशक्ती आहे समता पक्षाला खतपाणी घालत आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह देतांना या सगळ्या बाबी तपासल्या नाहीत का ? यामाघे काही कारण आहे ? असा सवालही अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे.

आजच्या दिवशी अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करणार आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांचेही वकिल युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे अनेक कळीचे मुद्दे आज चर्चिले जाणार आहे.

पुढील आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी ही सुनावणी होणार असल्याचेही आणि देसाई यांनी म्हंटलं आहे. अखेरच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या वकिलांना कोर्ट काही प्रश्न विचारू शकते आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल असेही खासदार अनिल देसाई यांनी शक्यता वर्तविली आहे.

Follow Us
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट