AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समता पक्षाला खतपाणी कोण घालतंय? निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट ठेवत अनिल देसाई यांचा रोख कुणावर ?

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणीचा दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यापूर्वीचा युक्तिवाद पाहता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

समता पक्षाला खतपाणी कोण घालतंय? निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट ठेवत अनिल देसाई यांचा रोख कुणावर ?
Image Credit source: Google
| Updated on: Feb 23, 2023 | 10:44 AM
Share

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल ( Adv Kapil Sibbal ) यांनी जवळपास दोन दिवस युक्तिवाद केला आहे. त्यानंतर आज पुन्हा तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. यामध्ये वकिल अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद होणार आहे. याच दरम्यान ठाकरे गटाकडे मशाल चिन्ह आहे, त्यावर समता पक्षानेही दावा केला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी एक भर पडणार आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई ( Anil Desai ) यांनी भाजपला नाव न घेता टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणीचा दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यापूर्वीचा युक्तिवाद पाहता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

त्याच दरम्यान ही सुनावणी पुढील आठवड्यातही होणार असल्याचा अंदाज ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी लावला आहे. आजचा दिवसही ठाकरे गटाचा युक्तिवाद करण्यासाठीच असल्याचे म्हंटले आहे.

तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पाहता मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यन्त निकाल येणं अपेक्षित असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी म्हंटले आहे. याशिवाय याच काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

याच मशाल चिन्हावर समता पक्षानेही आपला दावा सांगितला आहे. त्या विरोधात समता पक्ष न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढणार असल्याने अनिल देसाई यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

समता पक्षाला कोण बळ देत आहे ? कोणती महशक्ती आहे समता पक्षाला खतपाणी घालत आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह देतांना या सगळ्या बाबी तपासल्या नाहीत का ? यामाघे काही कारण आहे ? असा सवालही अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे.

आजच्या दिवशी अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करणार आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांचेही वकिल युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे अनेक कळीचे मुद्दे आज चर्चिले जाणार आहे.

पुढील आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी ही सुनावणी होणार असल्याचेही आणि देसाई यांनी म्हंटलं आहे. अखेरच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या वकिलांना कोर्ट काही प्रश्न विचारू शकते आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल असेही खासदार अनिल देसाई यांनी शक्यता वर्तविली आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...