Anju Nasrullah News : अंजू पाकिस्तानमध्ये अशा ठिकाणी होती, जिथे पाकिस्तान आर्मी जायला घाबरायची!

नवी दिल्ली : देशभर सीमा हैदर प्रकरण चर्चेत असताना आता सर्वजण अंजूबाबत एकू थक्क झाले आहेत. पाकिस्तामधून एकटी नाहीतर आपल्या ४ मुलांना सोबत भारतात आणणाऱ्या सीमानंतर आता अंंजू चर्चेत आली आहेत. अंजूने अनेकवेळा आपला जबाब दबलत, घूमजाव केला होता. मात्र अशातच अंजूबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. राजस्थानमधून अंजू पाकिस्तानमधील ज्या भागामध्ये गेली होती. तिथं पाकिस्तान […]

Anju Nasrullah News : अंजू पाकिस्तानमध्ये अशा ठिकाणी होती, जिथे पाकिस्तान आर्मी जायला घाबरायची!
one more anjun going to pakistan for love
| Edited By: | Updated on: Jul 30, 2023 | 1:51 PM

नवी दिल्ली : देशभर सीमा हैदर प्रकरण चर्चेत असताना आता सर्वजण अंजूबाबत एकू थक्क झाले आहेत. पाकिस्तामधून एकटी नाहीतर आपल्या ४ मुलांना सोबत भारतात आणणाऱ्या सीमानंतर आता अंंजू चर्चेत आली आहेत. अंजूने अनेकवेळा आपला जबाब दबलत, घूमजाव केला होता. मात्र अशातच अंजूबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

राजस्थानमधून अंजू पाकिस्तानमधील ज्या भागामध्ये गेली होती. तिथं पाकिस्तान आर्मीसुद्धा जायला घाबरते. कारण या भागामध्ये तेहरीक-ए-तालिबानची हुकूमत चालते. त्या ठिकाणी दहशतवादी त्यांना हवं तस कृत्या करतात. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात कारवाया सुरू आहेत. सर्व हल्ल्यांमध्ये या संघटनेचे नाव आहे. पाकिस्तानी लष्करही या दहशतवादी संघटनेवर कोणतीही कारवाई करण्यास घाबरत आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्यावर अमेरिका आणि युरोपोमध्ये पोहोचल्यासरखं वाटतं असं स्वत: अंजूने सांगितलं आहे. यानंतर २००७ मध्ये अंजू आणि तिचा पती अरविंद यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर दोघे एकत्र राहत होत  मात्र बाहेर नोकरीच्या उद्देशाने पासपोर्ट बनवला होता. दोघांना १५ वर्षांचा मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे. अंजू गेली ३ ते ४ वर्षांपासून पाकिस्तानमधील सोशल माध्यमांच्याद्वारे २९ वर्षाचाया नसरूल्लाह संपर्कात होती.

अंजू वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात पोहोचली आणि तिने त्याचा व्हिडिओही बनवला. पण नसरुल्लाला त्याने सोशल मीडियावर आपल्या मित्राबद्दल काहीही सांगितले नाही. पाकिस्तानात पोहोचल्यानंतर अंजूने आपल्या बहिणीला फोनवर पाकिस्तानला जाण्याबाबत सांगितले.

दरम्यान, आता अंजूचा पती अरविंद म्हणतो की, आता मुलं ठरवतील अंजूसोबत संबंध ठेवायचे की नाही? त्यामुळे ज्या नसरुल्लासाठी अंजू पाकिस्तानात गेली होती, त्याने लग्नाला नकार दिला आहे. ज्या कुटुंबासाठी ती त्यांना न सांगता पाकिस्तानला गेली होती ते तिच्या कृत्याला फसवणूक म्हणत आहेत. म्हणजेच आगामी काळात सीमाप्रमाणे अंजूलाही प्रश्नांची उत्तरे देत राहावे लागणार आहे.