AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ, CJP च्या आंदोलनाला मोठं यश

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ, CJP च्या आंदोलनाला मोठं यश
pm modiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 8:19 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली, नीट परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जतंर मंतरवर सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे.

सीजेपी आंदोलकांच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं, दरम्यान नीट परीक्षा पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण मंत्रालयाकडून (NTA) राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सीमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे, याची सुरुवात झाली असून, समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं आहे, अजूनही काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. हे सीजेपीच्या आंदोलनाला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे.

सीजेपी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यावर ठाम

दरम्यान दुसरीकडे सीजेपी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सोडून आम्हाला इतर काहीही मंजूर नसल्याचं सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल अशी भूमिका दिपके यांनी जाहीर केली आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप