AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election | बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान; 10 नोव्हेंबरला निकाल

बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

Bihar Election | बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान; 10 नोव्हेंबरला निकाल
| Updated on: Sep 25, 2020 | 1:44 PM
Share

नवी दिल्ली: बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोडा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे. (Bihar assembly elections to be held in 3 phases, says CEC)

बिहारमध्ये विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यात एकूण 243 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी 38 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत. बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. 2015 मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. हा नवमतदार बिहारच्या निवडणुकीचं गणित बदलू शकणार नसला तरी त्याचा या निवडणुकीवर नक्कीच प्रभाव जाणवेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

बिहार विधानसभा निवडणूक 2020 – तीन टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 71 मतदारसंघ – 16 जिल्हे – 31 हजार पोलिंग स्टेशन दुसरा टप्पा – 94 मतदारसंघ – 17 जिल्हे – 42 हजार पोलिंग स्टेशन तिसरा टप्पा – 78 मतदारसंघ – 15 जिल्हे – 33.5 हजार पोलिंग स्टेशन

10 जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान 28 जिल्ह्यात एका टप्प्यात मतदान

पहिला टप्पा मतदानाची तारीख – 28 ऑक्टोबर दुसरा टप्पा मतदानाची तारीख – 3 नोव्हेंबर तिसरा टप्पा मतदानाची तारीख – 7 नोव्हेंबर

निवडणुकांचा निकाल – 10 नोव्हेंबर

मतदानासाठी एक तास अधिक

मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराचं शारीरिक तापमान मोजण्यात येणार असल्याने त्यात वेळ जाणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन केलं जाणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये मतदानाचा कालावधी एका तासाने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिहारमध्ये मतदान पार पडणार आहे. मात्र, नक्षल प्रभावित विभागांमध्ये मतदान सायंकाळी ५ वाजताच संपणार आहे.

उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा लागणार

उमेदवारी अर्ज भरताना रॅली काढून उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनाच्या नावाखाली गर्दी करू नये म्हणून उमेदवारांकडून ऑनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच उमेदवारांना प्रतिज्ञापत्रंही ऑनलाइनच भरावे लागणार आहे. अनामत रक्कम सुद्धा ऑनलाइनच भरावी लागणार आहे. नामांकन अर्ज भरताना उमेदवारांसोबत केवळ दोनच लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच केवळ पाचच लोकांना डोअर टू डोअर निवडणूक प्रचार करता येणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. (Bihar assembly elections to be held in 3 phases, says CEC)

एका बुथवर केवळ एक हजार मतदार

संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग असून बिहारमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने संपूर्ण खबरदारी घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एका बुथवर केवळ एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे.

6 लाख पीपीई किट्स, 46 लाख मास्क

यावेळी बिहारमध्ये 6 लाख पीपीई किट्सचा वापर केला जाणार आहे. शिवाय राज्य निवडणूक आयोगाला ४६ लाख मास्क आणि 7 लाख हँड सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. त्याशिवाय 6 लाख फेस शिल्डही देण्यात येणार आहेत. बिहारमध्ये 18 लाख प्रवासी मजूर आहेत. त्यापैकी 16 लाख मजूर मतदान करू शकतात. तर 80 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक पोस्टल मतदान करू शकतात, असंही आयोगाने स्पष्ट केलं.

कोरोना पीडित मतदान करणार

बिहार विधानसभा निवडणुकीचा यंदाचा प्रचार व्हर्च्युअल होणार असून कोरोना पीडितांनाही मतदान करता येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आरोडा यांनी केली.

70 देशांत निवडणुका नाही

कोरोनाच्या संकटामुळे जगातील 70 देशांमध्ये निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत, याकडे लक्ष वेधतानाच कोरोनाकाळातील देशातील ही सर्वात मोठी निवडणूक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बिहारचे राजकीय बलाबल

एनडीए : 125

राजद : 80

काँग्रेस : 26

सीपीआय : 3

एचएएम : 1

एमआयएम : 1

अपक्ष : 5

खाली : 2

(एकूण जागा 243 सीट)

संबंधित बातम्या:

बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

बिहार निवडणुकीचा सुशांतसिंह प्रकरणाशी घेणं-देणं नाही – देवेंद्र फडणवीस

बिहार निवडणुकीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

(Bihar assembly elections to be held in 3 phases, says CEC)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ