Cockroach Janta Party : जमाव संसदेवर चालून येत होता, तेव्हा संसदेत कसं होतं वातावरण? भाजप खासदाराचा मोठा खुलासा
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी सुरु झालेल्या मोर्चाला आता देशव्यापी स्वरुप आलं आहे. अशात संसदेबाहेर आंदोलक पोहोचल्यानंतर आतमध्ये कसं वातावरण होतं यावर भाजप खासदार आणि अभिनेत्रीा कंगना राणौत यांनी मोठा खुलासा केला आहे.

Cockroach Janta Party : संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जंतरमंतर येथून संसदेपर्यंत मोर्चा काढला. यावेळी लाखो तरुण या मोर्चात सामिल झाले. वाढत असलेल्या आंदोलकांची संख्या पाहता दिल्ली पोलिसांनी कारवाई करत लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण जखमी देखीलझ झाले आहे. अशात जेव्हा मोर्चा संसदेवर धडकला, तेव्हा संसदेतील वातावरण कसं होतं यावर भाजप खासदार आणि अभिनेत्रीा कंगना राणौत यांनी मोठा खुलासा केला आहे. संसदेतून बाहेर येत असताना कंगना यांनी सर्व परिस्थिती होते. आमध्ये सगळे घाबरलेले… असं म्हणत राणौत यांनी मोठा खुलासा केला. आहे.
कंगना राणौत म्हणाल्या, आतमध्ये भीतीदायक वातावरण होतं. सगळे प्रचंड घाबरलेले होते आणि सगळे गेट देखील बंद करण्यात आलेले. संसदेत लोकं कौद झालेली, जमाव संसदेवर चालून येत होता तेव्हा आम्ही देखील घाबरलो. संसद भवनातील प्रत्येकालाच जमाव हल्ला करेल याची भीती वाटत होती, परंतु दिल्ली पोलीस एका ढालीप्रमाणे ठामपणे उभे राहिले.
#WATCH | Delhi | On the CJP protest outside Parliament yesterday, BJP MP Kangana Ranaut says, “All parliamentarians were inside the Parliament. We all were scared, thinking that the mob might attack us. I appreciate Delhi Police for playing the role of a shield, not letting… pic.twitter.com/Oop3B29PKw
— ANI (@ANI) July 21, 2026
मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर कंगना यांची तिव्र प्रतिक्रिया
मंत्र्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर कंगना यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारवर दबाव आणून कोणाला पदावरून हटवावं आणि कोणाला कायम ठेवावं हे ठरवता येत नाही आणि असा दबाव टाकणें ही योग्य पद्धत नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य करताना त्यांनी नमूद केलं की, देश कसा चालवावा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला असतो.
‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी देखील पुढे आले आहेत. रितेश देशमुख याच्यापासून शबाना आझमी आणि प्रकाश राज यांनी तरुणांचं समर्थन केलं. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कॉकरोच जनता पार्टी’चं समर्थन केलं जात आहे.