पंतप्रधानांच्या गुजरातमध्येच निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांना थेट इशाराच दिला

वटी गावातून जाणारी अंबिका नदीमुळे आता जनतेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांच्या गुजरातमध्येच निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांना थेट इशाराच दिला
महादेव कांबळे | Updated on: Nov 09, 2022 | 9:31 PM

नवी दिल्ली: गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने सध्या गुजरातचीच चर्चा आहे. डिसेंबर महिन्यामध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण, नवसारी जिल्ह्यातील गावामधील नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहेत. नवसारीत वाहणारी अंबिका नदी अनेक गावातून जाते, त्या नदीवर वटी गावाचाही समावेश आहे.

वटी गावातून जाणारी अंबिका नदीमुळे आता जनतेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही नदी ओलांडण्यासाठी पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आपल्याला पाण्यातून नदी पार करावी लागत असल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे येथील नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

वटी गावचे माजी सरपंच बाळभाई पाडवी म्हणतात की, वर्षभर नदी ओलांडूनच दुसऱ्या गावामध्ये जावे लागते. किंवा 25 किमीचा प्रवास करूनच नदी जावे लागेल.

पावसाळ्याच्या दिवसात या नदीमुळे सर्व व्यवहार ठप्प होतात. पावसाळ्यात नदी पाणीपातळीत वाढ झाली की, अनेक नागरिक गावामध्येच अडकून पडत असल्याचे सांगतात.

हा प्रश्न केवळ वाटी गावातील लोकांचाच नाही तर डांग आणि तापी जिल्ह्यातील लोकांचाही आहे. वटी व्यतिरिक्त, खरजई, कळंबा, सदरदेवी, सारा आणि केवडी, डुंगर्डा, बोरीगावठा, चिकार, जावडा, रायगड, अमोनिया आणि अल्मोरी यासह सुमारे 15 गावातील लोकांना या प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांनी यावेळी पूल नाही तर मत नाही असा पवित्रा घेतला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us