AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! आयुष्यमान भारतसह मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा, कॅगचे ताशेरे; प्रचंड खळबळ

केंद्रातील मोदी सरकारला हादरवून सोडणारी बातमी आहे. केंद्रातील सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. कॅगच्या अहवालात या योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

सर्वात मोठी बातमी ! आयुष्यमान भारतसह मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा, कॅगचे ताशेरे; प्रचंड खळबळ
CAG report Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2023 | 11:54 AM
Share

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीने तर हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.

मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये मोठे गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅगने हे ताशेरे ओढले आहेत. कॅगच्या अहवालानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या देशात एक देश विरोधी आणि मोदी विरोधी संस्था आहे. तीचं नाव कॅग आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय कटाची बळी पडली आहे. या संस्थने गेल्या काही दिवसात एकदोन नव्हे तर सात घोटाळे उघड केले आहेत. त्यामुळे कॅगवर मोदींनी तात्काळ ईडीचा रेड मारली पाहिजे, असा टोला सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला आहे.

कॅगची हिंमतच कशी झाली?

सात घोटाळ्याचा रिपोर्ट देण्याची कॅगची हिंमतच कशी झाली? अडीचशे कोटीचे 1800 कोटी कसे झाले? असा कोणता चमत्कार घडला? असा चिमटा काढतानाच कॅगने टोल प्लाझाचे ऑडिट केले. त्यात 132 कोटी रुपयांची लूट करण्यात आल्याचं म्हटलं आहे, असा दावाही श्रीनेत यांनी केला आहे.

मोदी बोलणार की नाही?

आयुष्यमान भारत योजनेत साडे सात लाख लोकांनी एकाच नंबरने रजिस्ट्रेशन केले होते. 88 हजार मृतांच्या नावाने क्लेम करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर होत आहे. विकासाच्या प्रकल्पात प्रचंड घोटाळा झाला आहे. सिंचन विभागने चुकीच्या लोकांना कंत्राट दिलं. ग्रामविकास मंत्रालयात घोटाळा झाला आहे, असं सांगतानाच पंतप्रधानांच्या डोळ्यासमोरच असं होत आहे. त्यावर आता पंतप्रधान बोलणार की नाही? असा सवालही त्यांनी केला.

एका रस्त्यासाठी…

एक रस्ता बनवण्यासाठी प्रति किलोमीटरसाठी 18 कोटींची मंजुरी देण्यात आली. मात्र, नंतर कोणत्याही मंजुरीशिवाय हाच रस्ता 251 कोटी खर्चून बनवला आहे. हा एवढा मोठा घोटाळा आहे, असा दावा आपच्या नेत्या प्रियंका कक्कड यांनी केला आहे.

या योजनांवर कॅगचे ताशेरे…

भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची तूट

आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल केंद्रावरून नोंद

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेलाया 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.

अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन रम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचा निधी स्वच्छ भारत योजनेचे फलक लावण्यासाठी वळवले.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान

द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.