भारतीय जमिनीवर चीनचा कब्जा, बॉर्डरवर धक्कादायक घडामोडी, थेट चीनींनी..

भारत आणि चीन यांच्यात कायमच मोठा सीमावाद राहिला. त्यामध्येच अरुणाचल प्रदेश हा वादाचा मुद्दा राहिला. चीन कायमच अरुणाचल प्रदेश आपला असल्याचा दावा करतो. यादरम्यानच आता भारतात खळबळ उडवणारी माहिती पुढे आली.

भारतीय जमिनीवर चीनचा कब्जा, बॉर्डरवर धक्कादायक घडामोडी, थेट चीनींनी..
India China Border
| Updated on: Jun 29, 2026 | 12:20 PM

भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद आहे. मोठी झडप देखील काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन सीमेवर झाली. थेट खोल नदीत सैनिक फेकून देण्यात आले. दगडे एकमेकांच्या सैन्यावर फेकण्यात आली. यादरम्यानचे काही धक्कादायक व्हिडीओही व्हायरल झाले होते. यादरम्यानच आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून भारतासाठी अत्यंत वाईट बातमी पुढे येत आहे. भारतीय जमिनीवर चीनने कब्जा केला आहे. सुबनसिरी जिल्ह्यातील स्थानिक नाह आदिवासी समुहाने दावा केला की, चीन त्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहे. त्यांनी म्हटले की, नियंत्रण रेषा अर्थात एलओसीजवळ चीनच्या सैन्याने भारतीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात कब्जा केला. आदिवासी संघटना नाह वेलफेअर सोसायटीने जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ह वेलफेअर सोसायटीने दावा केला की, मागच्या 6 वर्षात चीन सैन्य त्यांच्या पूर्वजांच्या असलेल्या जमिनींवर कब्जा करत आहे. चीनचे सैन्य गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हळूहळू करून पुढे पुढे सरकत आहे. मात्र, 2020 पासून त्यांनी अधिक प्रगती पथावर भारताच्या जमिनीवर कब्जा करण्यास सुरूवात केली. नाह वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चादर यांनी धक्कादायक दावा केला.

त्यांनी म्हटले की, आमचे भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. ते आमच्या जमिनीचे रक्षण करत आहेत. मात्र, ताक्सिंग क्षेत्रात चीनी पीएलए अ्त्यंत वेगाने पुढे सरकत आहेत. हे अत्यंत घातक आहे. प्रत्येक दिवशी आमची जमीन चीनच्या ताब्यात जात आहे. भारतीय जमिनीवर चीन रस्ते आणि त्यांचे सैन्य कॅम्प तयार करत आहे. भारतासाठी अरुणाचल प्रदेश हा महत्वाचा भाग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करतो.

अरुणाचल प्रदेशमधील अनेक गावे आपल्या नकाशात दाखवतो. त्यामध्येच आता भारतीय जमिनीवर कब्जा चीनकडून करण्यात आल्याचे सांगितले जातंय. त्यामध्येच आता चीनकडून थेट भारतीय जमिनीवर कब्जा केला जात असल्याने मोठी खळबळ उडाली. आता भारतीय सैन्य यावर नक्की काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ज्यामुळे चीन आणि भारत यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो.

Follow Us