AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानात भाजपचा काँग्रेसला ‘दे धक्का’, पाच मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले

14 जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा, तर पाच जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला.

राजस्थानात भाजपचा काँग्रेसला 'दे धक्का', पाच मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 09, 2020 | 2:03 PM
Share

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची जादू ओसरल्याचे चित्र पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसले. राज्यातील पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून विरोधी पक्ष भाजपने शानदार कामगिरी केली. राजस्थानातील 21 जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिली. गेहलोत कॅबिनेटमधील पाच नेत्यांच्या जिल्ह्यातही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. (Congress gets set back in Rajasthan Panchayat Samiti and ZP Election by BJP)

भाजपची सरशी

राजस्थानात एकूण 4 हजार 371 पंचायत समितींच्या निवडणुका झाल्या. यापैकी भाजपने 1 हजार 911 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 1 हजार 780 जागा खिशात घालता आल्या. याशिवाय 425 पंचायतींमध्ये अपक्षांनी विजय मिळवला. आरएलपीने 56, माकपने 16, बसपने तीन, तर राष्ट्रवादीने एका पंचायत समितीवर झेंडा रोवला.

दुसरीकडे, जिल्हा परिषदांच्या 636 जागांवर निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने 353 जागा जिंकल्या, तर काँग्रेस 252 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. आरएलपी 10, तर 18 अपक्षांनी जिल्हा परिषदेत जागा पटकावल्या आहेत. भाजप 14 जिल्हा परिषदांमध्ये आपला अध्यक्ष बसवण्यात यशस्वी ठरली, तर केवळ पाचच जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला.

नड्डांकडून शेतकरी-महिलांचे आभार

नागौर जिल्ह्यात हनुमान बेनीवाल यांचा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहे. तर डुंगरपूरमध्ये बीटीपीच्या हातात जिल्ह्याध्यक्षपद निवडण्याची ताकद आहे. पंचायत निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुभेच्छा दिल्या.

गेहलोतांच्या मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेस पराभूत

भाजप अजमेर, जालौर, झालावाड, झुंझुनू, पाली, राजसमंद, बाडमेर, भीलवाडा, बूंदी, चितौडगढ, चुरु, सीकर, टोंक आणि उदयपूर या जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष बनवण्यात यशस्वी ठरली आहे. तर बांसवाडा, भीलवाडा, प्रतापगढ, हनुमानगढ आणि जैसलमेर जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा अध्यक्ष असेल. (Congress gets set back in Rajasthan Panchayat Samiti and ZP Election by BJP)

पायलटांच्या मतदारसंघातही काँग्रेसला धक्का

अशोक गेहलोत कॅबिनेटमधील रघु शर्मा यांच्या अजमेर, उदयलाल आंजना यांच्या निंबाहेडा, गोविंद डोटासरा यांच्या लक्ष्मणगढ आणि क्रीडा राज्यमंत्री अशोक चांदना यांच्या हिंडौली जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव झाला. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या टोंक आणि गेहलोत यांचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी यांच्या नावा मतदारसंघातही काँग्रेला पराभवाचा धक्का बसला.

दिग्गज नेत्यांचे नातेवाईक हरले

केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांचे पुत्र रवीशेखर बिकानेर जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत पराभूत झाले. सादुलपुर काँग्रेस आमदार कृष्णा पुनिया यांच्या सासूबाई आणि भावजय पंचायत समिती सदस्य निवडणुकीत हरल्या. सरदारशहरचे काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांची पत्नी मनोहरीदेवी शर्मा यांना अपक्ष रिंगणात उतरलेले दीर श्यामलाल शर्मा यांनीच पराभूत केले.

भाजप आमदार गोपीचंद मीणा यांच्या मातोश्री उगमा देवी यांचा हाजपूर पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला. गढीमधील भाजप आमदार कैलाश मीना यांच्या सूनबाईही पराभूत झाल्या. श्रीमाधोपूरचे माजी आमदार झाबर खर्रा यांचे पुत्र दुर्गा सिंह आणि काँग्रेसचे माजी आमदार कांता भील यांचे पुत्र अरथुनातून निवडणूक हरले.

संबंधित बातम्या :

कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती

लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

(Congress gets set back in Rajasthan Panchayat Samiti and ZP Election by BJP)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ