AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले दिल्ली, काय होता वायू गुणवत्ता दर?

दिवाळीच्या दिवशी दिल्ली जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले. फटाक्यांमुळे दिल्लीची हवा विषारी झालेली आहे.

Diwali 2022: दिवाळीच्या दिवशी जगातले सर्वात प्रदूषित शहर ठरले दिल्ली, काय होता वायू गुणवत्ता दर?
दिवाळीत दिल्लीची हवा विषारी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 25, 2022 | 10:49 AM
Share

दिल्ली, देशाची राजधानी असलेली दिल्ली (Delhi) दिवाळीच्या दिवशी (Diwali 2022) जगातल्या प्रदूषणाची राजधानी ठरली. दिल्लीतील प्रदुषणाची पातळी (Pollution Lavel) आधीच वाढलेली आहे. दिवाळीनिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्विस संस्थेच्या IQAir नुसार सोमवारी ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. यानंतर पाकिस्तानचे लाहोर दुसऱ्या स्थानावर होते. दिवाळीत दिल्लीचा AQI 312 वर होता. शहराने 2018 मध्ये 281 AQI नोंदवले होते.

गतवर्षीच्या तुलनेत किंचित सुधारणा

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत दिल्लीत कमी प्रदूषण होते ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिवाळीत दिल्लीचा AQI 382 होता. तर 2016 मध्ये AQI 431 होता.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूटचे चेअर प्रोफेसर गुफ्रान बेग म्हणाले की, राजधानीतील हवेची गुणवत्ता मंगळवारी गंभीर झोनमध्ये घसरू शकते, परंतु वाऱ्याचा वेग आणि दुपारी उष्ण वातावरण सुधारल्याने प्रदूषकांचे विखुरले जाण्यास मदत होईल.

दिल्लीच्या आजूबाजूच्या शहरांची स्थिती कशी होती हे  जाणून घेऊया.

गाझियाबादमध्ये AQI 301 होता नोएडा मध्ये 303 ग्रेटर नोएडा मध्ये 270 गुरुग्राममध्ये 325 फरिदाबादमध्ये २५६

हवेची गुणवत्ता पातळी

AQI कोणत्या श्रेणीमध्ये तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो हे जाणून घेऊया. शून्य ते 50 मधील AQI ‘चांगला’ मानला जातो. तर 51 ते 100 ‘समाधानकारक’ मानले जातात. तर 101 ते 200 ची’मध्यम आणि 201 ते 300 घातक श्रेणीत वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या शहराचा AQI 301 ते 400 च्या दरम्यान असेल तर तेथील हवा विषारी  असते. आणि 401 ते 500 अति गंभीर मानले जातात.

हिवाळा सुरू झाला की देशातील मोठ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावू लागते. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसतो, जिथे हवा अशा प्रकारे विषारी होते की, लोकांना श्वास घेणे कठीण होते. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळेही हवेतील प्रदूषण झपाट्याने वाढते.

Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.