
भारतातील आघाडीचे न्यूज नेटवर्क TV9 चा लोकप्रिय कार्यक्रम Duologue NXT चा नवीन भाग आज प्रदर्षित होणार आहे. या खास भागात TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे रिझक आर्ट इनिशिएटिव्हच्या संस्थापक आणि बिझनेस मॅग्नेट युसुफ अली एमए यांची कन्या शफिना युसुफ अली यांच्याची मुलाखत घेणार आहेत. रेडिको खेतान प्रस्तुत ही मुलाखत आज रात्री (बुधवार) 10:30 वाजता News9 वर प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत Duologue YouTube चॅनेल (@Duologuewithbarundas) आणि News9 Plus अॅपवर देखील पाहता येणार आहे.
आजच्या या मुलाखतीत बरुण दास यांनी आपल्या खास शैलीत शफिना यांना प्रश्न विचारले आहेत. या विशेष भागात, शफिना यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिजच्या बोर्डरूमपासून अबू धाबीच्या कला जगतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला आहे.
टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी ड्युओलॉग एनएक्सटीला एका वेगळ्या स्तरावर नेले आहे. हा भाग कला आणि बुद्धिमत्तेच्या संगमाचे एक खास उदाहरण आहे. ड्युओलॉगबद्दलचा आपला अनुभव सांगताना शफिना म्हाणाली की, “प्रत्येक मुलाखत तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घेऊन येते. बरुण हे अतिशय मनोरंजक सूत्रसंचालक आहेत. त्यांनी अनेक भिन्न विषयांवर प्रश्न विचारले आणि या जगात आणि कॉर्पोरेट जगात एक पुरुष मन स्त्री असण्याबद्दल काय विचार करते याबद्दल मला खरोखर विचार करायला लावला.”
यावर बोलताना बरुण दास म्हणाले की, ‘मी नेहमीच म्हणतो की रतनात्मकता स्वावलंबी असावी. कला ही अभिव्यक्ती आहे, परंतु ती व्यवसाय परिसंस्थेला देखील पात्र आहे, कारण जेव्हा रतनात्मकता स्वयं-निधी असते तेव्हा ती भरभराटीला येते.’
खरं तर शफिना यांनी ‘रिज़्क’ ज्या प्रकारे स्थापन केलं, ते केवळ एक कला मंच नाही, तर ही एक प्रकारची अभिव्यक्तीची अर्थव्यवस्था आहे. शफिना म्हणतात, “जर तुम्हाला कलेची ओढ नसेल, तर तुम्ही कलेत व्यावसायिक होऊ शकत नाही.” त्या म्हणाल्या, “कला हे एक व्यावसायिक क्षेत्र आणि एक ध्यास, दोन्ही आहे, आणि मला वाटतं हेच सर्वात चांगलं काम आहे.”
अबू धाबीमध्ये 1,700 चौरस मीटर क्षेत्रात वसलेलं “रिज़्क आर्ट इनिशिएटिव” हे एक सांस्कृतिक जागा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू झालं आणि आता ते एक चळवळ बनलं आहे – एक सामाजिक उपक्रम – जो कलाकारांना पोसतो, विविध सांस्कृतिक संवादांना प्रोत्साहन देतो आणि सर्जनशील शाश्वततेच्या परिसंस्थेला नव्यानं व्याख्यित करतो. शफिना यांच्यासाठी, मिशन स्पष्ट आहे: ‘एकमेकांच्या विश्वात एक खिडकी उघडणे’.
“एक इंडोनेशियन कलाकाराला भारतीय कलाकाराच्या शेजारी आणि इराकी कलाकाराच्या बाजूला ठेवा. त्यांच्या कलाकृती परस्परांशी संवाद साधू लागतात, आणि त्या संवादातून खरी संस्कृती तयार होते,” असं त्या सांगतात.
संवाद कलेच्या व्यवसायापासून ध्यास आणि वास्तववाद, मातृत्व आणि महत्त्वाकांक्षा, वारसा आणि व्यक्तिमत्व यांच्यात संतुलन राखत सहजतेनं पुढे जातो. एका टप्प्यावर, शफिना त्यांच्या ‘काच आणि कागदाच्या तत्त्वज्ञानाचा’ उल्लेख करतात – हे वेळ आणि प्राधान्य व्यवस्थापनाचं एक असं तत्वज्ञान आहे जे जितकं काव्यात्म आहे तितकंच व्यावहारिकही.
दैनिक जीवनातील शिकवणी वास्तवाशी जोडत त्या सांगतात, “आपण दररोज तीन चेंडू हाताळतो – काम, कुटुंब आणि स्वतःला. काही काचेसारखे असतात – जर ते पडले तर कायमचे तुटतात. काही कागदासारखे असतात – जर ते पडले, तर नंतर उचलता येतात. महत्त्वाचं हे ओळखणं की कोणता चेंडू कशाचा आहे.”
जेव्हा त्यांना दीर्घकालीन दृष्टिकोनाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा त्यांचं उत्तर व्यापक पण जमिनीवर आधारलेलं होतं. “स्वप्न आहे एक जागतिक सांस्कृतिक केंद्र उभारण्याचं – जिथे भारत आणि संयुक्त अरब अमीरातमधील कलाकारांना जगभरात पाठवता येईल आणि जगभरातील कलाकारांना इथे आणता येईल. हे जोडणं आहे, स्पर्धा नव्हे,” असं त्या म्हणतात.