JNU Violence LIVE: जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागची पाच कारणे

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी संध्याकाळी उशिरा डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये (JNU Student) हिंसक संघर्ष झाला. त्यामध्ये 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रामनवमी आणि नॉनव्हेज खाण्यावरून गदारोळ झाला आहे. त्यानंतर कावेरी हॉस्टेलच्या (Kaveri Hostel) मेसमध्ये हाणामारी झाली. काही वेळात अखिल भारतीय छात्र परिषदेचे (ABVP) विद्यार्थी पत्रकार परिषद घेणार आहेत.

JNU Violence LIVE: जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागची पाच कारणे
जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागचं पाच कारणेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 11:33 AM

मुंबई – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी संध्याकाळी उशिरा डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये (JNU Student) हिंसक संघर्ष झाला. त्यामध्ये 60 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रामनवमी आणि नॉनव्हेज खाण्यावरून गदारोळ झाला आहे. त्यानंतर कावेरी हॉस्टेलच्या (Kaveri Hostel) मेसमध्ये हाणामारी झाली. काही वेळात अखिल भारतीय छात्र परिषदेचे (ABVP) विद्यार्थी पत्रकार परिषद घेणार आहेत. झालेल्या घडामोडीबाबत ते आपली बाजू मांडणार आहेत. याशिवाय डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी संघटना दुपारी दोन वाजता दिल्ली पोलीस मुख्यालयाचा घेराव घालणार आहेत.

दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून JNU विद्यार्थी संघटना, SFI, DSF आणि AISA यांच्यातील हिंसक संघर्षाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कलम 323/341/509/506/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणते विद्यार्थी दुखावले आहेत. त्याचा तपशील आता गोळा केला जात आहे.

जाणून घ्या राड्यामागचं कारणे

  1. जेएनयूच्या कावेरी हॉस्टेलच्या मेसमध्ये एका बाजूला इफ्तार पार्टी सुरू होती. तर दुसऱ्या बाजूला रामनवमी साजरी करण्यात येत होती. त्यावेळी दोन गटात मारामारी झाली
  2. भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी काल चार ते पाच वाजणाच्या सुमारास मेसमधील मांसाहारी जेवण बंद करण्याची धमकी दिली होती. तसेच तिथून एका चिकन विक्रेत्याला सुध्दा पळवून लावलं होतं. तसेच मेस कमिटीमधील काही सदस्यांनी सुध्दा हमला केला होता.
  3. डाव्या विचारणीच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांची पसंतीचा जेवण असायला हवं असं सांगितलं. साधारण साडेसात वाजणाच्या सुमारास भारतीय विद्यार्थी परिषदेचे काही गुंडे काही विद्यार्थ्यांना मारहाण करीत असल्याचे पाहायला मिळाले.
  4. एनएस बालाजी यांनी सांगितले की, काही विद्यार्थी हॉस्टेलच्या गेटवरती होते. तर काही विद्यार्थी ट्यूब लाईट आणि झाडांवरती दगड मारण्याचं काम करीत होते. काही लोकांनी तिथल्या महिलांशी गैरवर्तन केल्याचं सुध्दा सांगितलं आहे.
  5. जेएनयू प्रशासनाने आता कथित मांसाहार बंद करण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जेएनयू प्रशासनाने कावेरी वसतिगृहाच्या वॉर्डन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांची बाजूही जाणून घेतली जाणार आहे. दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Sanjay Raut: सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात सामिल होऊ नका अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल; राऊतांचा राज्यपालांना इशारा

भोंग्यावरून मनसेमधली खदखद तीव्र; आता धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांचा राजीनामा

Nanded | बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.