Azadi ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी लिहिले ‘इन्कलाब झिंदाबाद’, भगतसिंग यांनी प्रसिद्धी दिली

हसरत मोहनी यांचा जन्म 1875 मध्ये उन्नाव जिल्ह्यातील मोहनी गावात झाला, त्यांचे खरे नाव 'सय्यद फजलुल्हासन' आणि आडनाव 'हसरत' होते. पुढे ते हसरत मोहनी या नावानेच ओळखले जाऊ लागले.

Azadi ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी लिहिले 'इन्कलाब झिंदाबाद', भगतसिंग यांनी प्रसिद्धी दिली
स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी लिहिले 'इन्कलाब झिंदाबाद', भगतसिंग यांनी प्रसिद्धी दिली
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 4:04 PM

नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत (freedom fighter) घोषणांची भूमिका खूप महत्त्वाची होती, लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी घोषणांचा वापर केला जात होता, अशीच एक घोषणा होती ‘इन्कलाब झिंदाबाद’, (inquilab zindabad) भगतसिंग (Bhagat Singh) यांनी त्यांच्या क्रांतिकारी जीवनात ही घोषणा वापरली. फार कमी लोकांना माहित असेल की ही घोषणा सर्वप्रथम स्वातंत्र्यसेनानी हसरत मोहनी यांनी 1921 मध्ये वापरली होती, ती त्यांच्याच लेखणीने लिहिलेली घोषणा होती. TV9 च्या खास मालिकेत आज आम्ही तुम्हाला हसरत मोहनी आणि त्यांनी लिहिलेल्या ‘इन्कलाब झिंदाबाद’ या घोषवाक्याबद्दल सांगत आहोत. हसरत मोहनी यांचा जन्म 1875 मध्ये उन्नाव जिल्ह्यातील मोहनी गावात झाला, त्यांचे खरे नाव ‘सय्यद फजलुल्हासन’ आणि आडनाव ‘हसरत’ होते. पुढे ते हसरत मोहनी या नावानेच ओळखले जाऊ लागले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. 1903 मध्ये त्यांनी अलीगढमधून बी.ए.ची पदवी घेतली.

ब्रिटिश सरकारच्या धोरणांना विरोध केला

बी.ए.चे शिक्षण पूर्ण केल्यावर हसरत मोहनी यांनी अलीगढमधून उर्दू-ए-मुल्ला हे मासिक काढण्यास सुरुवात केली, हे मासिक इंग्रजी सरकारच्या धोरणांच्या विरोधात होते, 1904 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.

इंग्रजांनी अटक केली

मोहनी हे ब्रिटीश सरकारच्या धोरणांना सतत विरोध करत होते, 1907 मध्ये त्यांनी त्यांच्या मासिकात ‘ब्रिटनची पॉलिसी इन इजिप्त’ या विषयाशी संबंधित एक लेख प्रकाशित केला, ज्यामुळे ब्रिटीश प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. 1919 मध्ये त्यांनी खिलाफत चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.

इंकलाब झिंदाबादचा नारा 1921 मध्ये लिहिला होता

हसरत मोहनी यांनी 1921 मध्ये सर्वप्रथम स्वतःच्या लेखणीने इंकलाब झिंदाबादचा नारा लिहिला, ही घोषणा नंतर खूप प्रसिद्ध झाली, भगतसिंग यांनी त्यांच्या संपूर्ण क्रांतिकारी जीवनात ही घोषणा वापरली जी जनचेतना जागृत करण्यात खूप उपयुक्त ठरली.

ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थन करणारे होते

हसरत मोहनी हे सुरुवातीपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते, ते लोकमान्य टिळक आणि डॉ. आंबेडकर यांच्या जवळच्या मित्रांपैकी होते. श्रीकृष्णाच्या भक्तीत त्यांनी कविताही केल्या. भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेदरम्यान 1946 मध्ये त्यांना संविधान सभेचे सदस्य बनवण्यात आले.

फाळणीला विरोध केला

लेखक, कवी आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून आयुष्यभर ब्रिटिश सरकारचा विरोध करणाऱ्या हसरत मोहनी यांनी 1947 मध्ये भारताच्या फाळणीलाही विरोध केला होता. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवडीचा मुद्दा आला तेव्हा हसरत मोहनी यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. 13 मे 1951 रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. 2014 मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटही जारी केले आहे.


        
Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....