GK : जर अणुबॉम्ब हल्ला झाला तर जगातील कोणत्या देशाला सर्वाधिक धोका? होणार सर्व काही उद्ध्वस्त

सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये जर हे युद्ध अण्विक युद्धाकडे वळलं तर सर्वात जास्त नुकसान कोणत्या देशाचं होऊ शकतं? यावर आता तज्ज्ञांचं मत समोर आलं आहे.

GK : जर अणुबॉम्ब हल्ला झाला तर जगातील कोणत्या देशाला सर्वाधिक धोका? होणार सर्व काही उद्ध्वस्त
nuclear bomb
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 6:38 PM

इस्त्रायल, इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आता 4 आठवडे झाले आहेत. मात्र तरी देखील युद्धविराम झालेला नाहीये. हे युद्ध आता अशा टप्प्यावर पोहोचलं आहे, जिथे अणुयुद्ध होईल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका उडाला. दरम्यान इस्त्रालयने इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या युद्धात आतापर्यंत इराणचे अनेक टॉप कमांडर मृत्यूमुखी पडले असून, प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धात इराणमधील अनेक सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे इराणकडून सुरू असलेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला आहे, आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैन्य तळांना देखील इराणकडून लक्ष्य केलं जात आहे.

अमेरिकेनं इराणकडे युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवला होता तो देखील इराणने फेटाळून लावला आहे, आता आमच्या मर्जीने युद्ध थांबेल असं इराणे म्हटलं आहे. अमेरिका आणि इस्त्रायल देखील युद्धातून माघार घेण्यास तयार नाहीये, दरम्यान जर हे युद्ध थांबलं नाही तर परिस्थिती आण्विक युद्धपर्यंत देखील पोहोचू शकते. जर अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये आण्विक युद्ध झालं तर सर्वात जास्त कोणत्या देशाचं नुकसान होईल , याबाबत अनेकांच्या मनात भीती आहे.

जर आण्विक युद्ध झालं तर सर्वात जास्त धोका कोणत्या देशाला असू शकतो? याबाबत आता संरक्षण तज्ज्ञांकडून आपलं मत व्यक्त करण्यात आलं आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मतानुसार जर या युद्धाचं रुपांतर आण्विक युद्धात झालं तर सर्वात जास्त नुकसान हे लंडन सारख्या जास्त घनतेच्या शहरांमध्ये होऊ शकतं. प्रचंड प्रमाणात जीवीतहानी होऊ शकते. एवढंच नाही तर ज्या -ज्या ठिकाणी शत्रू राष्ट्रांचे मोठे सैन्य बेस आहेत अशा ठिकाणी देखील अणुबॉम्बचा हल्ला होऊ शकतो. तसेच शत्रू राष्ट्रांकडून अणुबॉम्ब हल्ल्यासाठी देशांच्या राजधानींच्या शहरांची निवड केली जाऊ शकते, असंही संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे.

 

Follow Us