AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीच्या हातावरची ती गोष्ट पाहाताच तरुणानं लग्न मंडपातून ठोकली धूम; वराचे आई वडील अन् पाहुणेही झाले गायब

ही घटना खडगदा गावात घडली आहे. एका तरुण आणि तरुणीचं लग्न ठरलं होतं. त्यासाठी मंगल कार्यालय देखील बुक करण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच ही धक्कादायक घटना घडली आहे.

नवरीच्या हातावरची ती गोष्ट पाहाताच तरुणानं लग्न मंडपातून ठोकली धूम; वराचे आई वडील अन् पाहुणेही झाले गायब
marriageImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 23, 2025 | 8:20 PM
Share

प्रत्येक तरुण, तरुणी आपल्या लग्नाचं स्वप्न पाहात असतात. विवाहासाठी ते खास प्लॅनिंग देखील करतात. मात्र लग्नाच्या दिवशीच दोघांपैकी एक जोडीदार अचानक लग्नाच्या मंडपातून गायब झाला तर दुसऱ्या जोडीदाराला काय वाटत असेल? त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल? असंच एक प्रकरण झारखंडमधल्या चतरा जिल्ह्यातून समोर आलं आहे. या प्रकरणात नव वधू सजून धजून लग्नासाठी आपल्या होणाऱ्या पतीची वाट पाहात होती, मात्र हे लग्न झालंच नाही, या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना खडगदा गावात घडली आहे. एका तरुण आणि तरुणीचं लग्न ठरलं होतं. त्यासाठी मंगल कार्यालय देखील बुक करण्यात आलं होतं. लग्नाचा दिवस उजडला.वधू विवाहासाठी तयार होती, ती लग्न मंडपात आपल्या भावी पतीची वाट पाहात होती. एवढ्यात तिचा होणारा पती सुनील कुमार हा वरात घेऊन वाजत गाजत लग्न मंडपात पोहोचला. थोड्याच वेळात लग्न होणार होतं, मात्र त्यानंतर एक घटना अशी घडली की, लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे एक एक करून गायब होऊ लागले, त्यानंतर नवरदेव देखील गायब झाला, या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

दशरथ प्रजापती यांनी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्व व्यवस्था केली होती. वर पक्ष नाराज होऊ नये, यासाठी त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती, प्रचंड पैसा खर्च केला होता. वरात देखील लग्न मंडपात पोहोचली होती, मात्र त्याचवेळी अशी घटना घडली की, वर त्यानंतर त्याचे आई-वडील आणि लग्नासाठी आलेले इतर पाहुणे देखील लग्न मंडपातून एक एक गायब झाले. त्यामुळे हे लग्न होऊ शकलं नाही. या प्रकरणात आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान पोलीस तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, होणाऱ्या पतीने आपल्या वधूचा हात पाहिला, तिच्या हातावर त्याला पांढरे डाग दिसले, त्यामुळे त्याने लग्नाला नकार दिला. त्यानंतर वराचं अख्ख कुटुंबच लग्न मंडपातून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.