AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी 1950 साली शारदा पीठ शंकराचार्यांनी स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंड-संन्यासाची दीक्षा घेतली होती. असे असले तरी वयाच्या 9 व्या वर्षीच त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. पुढे त्यांना स्वामी स्वरूपानंद सरस्वती या नावाने ते ओळखले जाऊ लागले. राजकारणातही ते खूप सक्रिय होते.

हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन
| Updated on: Sep 11, 2022 | 6:16 PM
Share

दिल्ली : (Hinduism) हिंदू धर्माबरोबरच ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग तर होताच पण राम मंदिरासाठी ज्या (Swaroopanand Saraswati) शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी प्रदीर्घ असा लढा उभा केला होता त्यांचे रविवारी निधन झाले आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी या छोट्याशा गावात एका ब्राम्हण कुटुंबात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता. हिंदू धर्माचे ते सर्वात मोठे (Religious leader) धर्मगुरु होते. जिल्हा नरसिंहपूर येथील परमहंसी गंगा आश्रमात रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदू धर्माबरोबरच त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातही मोठे योगदान राहिले होते. नुकताच त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ते द्वारका आणि ज्योतिर्मठ या दोन मठांचे शंकराचार्य होते.

स्वातंत्र्य लढ्यात 9 महिने तुरुंगवासही भोगला

वयाच्या नवव्या वर्षी जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हिंदू धर्मासाठी धर्मायात्रा सुरु केली होती. त्या दरम्यान ते काशीला पोहचले होते. तर दुसरीकडे देशात आंदोलने ही सुरु होती. महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता. त्यावेळी स्वामींनीही या लढ्यात उडी घेतली होती. त्यामुळे वयाच्या 19 व्या वर्षी त्यांना 9 महिने तुरुंगवासही झाला होता. ते वाराणसीच्या तुरुंगात होते.

हिंदू धर्मासाठी असे होते योगदान

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी 1950 साली शारदा पीठ शंकराचार्यांनी स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंड-संन्यासाची दीक्षा घेतली होती. असे असले तरी वयाच्या 9 व्या वर्षीच त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. पुढे त्यांना स्वामी स्वरूपानंद सरस्वती या नावाने ते ओळखले जाऊ लागले. राजकारणातही ते खूप सक्रिय होते. एवढेच नाहीतर त्यांनी अनेक मुद्द्यांवर आवाजही उठवला होता.

नुकताच झाला होता 99 वा वाढदिवस

जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे आजारी होते. मध्यंतरीच त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. शिवाय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या होत्या. धर्मप्रसाराबरोबरच राजकारणील अनेत बड्या नेत्यांशी त्यांचे सबंध होते. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या वाढदिवशीच दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली होती. पण त्यांचे आज निधन झाले आहे.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.