AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LAC वर भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करार, जयशंकर यांनी कोणाला दिले श्रेय

पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, विश्वास आणि सहकार्याची भावना तयार करणे ही दीर्घ प्रक्रिया असल्याने संबंध सामान्य होण्यासाठी वेळ लागेल. भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेण्याबाबत करार झाला आहे. काय आहे तो करार. याचे श्रेय कोणाला दिलेय.

LAC वर भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करार, जयशंकर यांनी कोणाला दिले श्रेय
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 27, 2024 | 12:48 AM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव आता कमी झाला आहे. भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपूर्वीच सीमेवर गस्त घालण्याबाबत करार झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कराराचे श्रेय भारतीय लष्कर आणि मुत्सद्देगिरीला दिलंय. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोक भागात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये शुक्रवारी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, जी 29 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 30 ते 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा गस्त सुरू करण्यात येणार आहे.

पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एस जयशंकर म्हणाले की, विश्वास आणि सहकार्याची पुनर्बांधणी ही दीर्घ प्रक्रिया असल्याने संबंध सामान्य होण्यासाठी वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रशियातील कझान येथे नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील भेटून भविष्यातील रणनीतीवर विचार करतील, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

जयशंकर म्हणाले, “आम्ही आज जिथे आहोत त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत याचे एक कारण हे आहे की, आम्ही आमची बाजू मांडण्याचा आणि आमचे विचार मांडण्याचा खूप दृढ प्रयत्न केला. देशाच्या रक्षणासाठी सैन्य आहे. अतिशय अकल्पनीय परिस्थितीत ते उपस्थित (एलएसी)  असतात आणि आपले काम करतात.” भारत आता गेल्या दशकाच्या तुलनेत पाचपट अधिक संसाधने खर्च करत आहे, ज्यामुळे लष्कराला प्रभावीपणे तैनात केले जाऊ शकते.

ते म्हणाले की 2020 पासून सीमेवरील परिस्थिती अस्थिर आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर विपरीत परिणाम झालाय. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये तोडगा काढण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. एस जयशंकर म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा विलगीकरणाचा आहे, कारण दोन्ही सैन्यांमधील अंतर खूपच कमी आहे आणि कोणतीही घटना घडण्याची शक्यता कायम आहे. यानंतर डी-एस्केलेशन (तणाव कमी करण्याचा) मुद्दा येतो, कारण दोन्ही बाजूंच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे.

जयशंकर म्हणाले की 2020 नंतर भारत आणि चीनमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये करार झाला की सैन्य माघार घेईल, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा गस्तीबाबत होता. नुकतेच 21 ऑक्टोबर रोजी डेपसांग आणि डेमचोक भागात दोन्ही बाजूंनी पूर्वीप्रमाणे गस्त सुरू करण्याचे मान्य केले होते. या करारानंतर भारत-चीन संबंध सुधारण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे, परंतु दोन्ही देशांमधील विश्वास पुन्हा जागा करणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.

Follow Us
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका काय?
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
Pune Hinjewadi | हिंजवडीत ड्रंक अँड ड्राइव्हचा कहर; मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!