एकावे ते नवलच… भारतातील या गावात प्रत्येक पुरुष करतो दोन लग्न; जाणून घ्या, काय आहे त्यामागचे रहस्य!

जगात अनेक विचित्र प्रथा आहेत ज्या आजही पाळल्या जातात. केवळ जगातच नाही तर भारतातही अशा अनेक परंपरा पाळल्या जातात, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. भारतातील असे एक गाव आहे, की तेथील प्रत्येक पुरुष दोन लग्न करतो आणि दोन्ही बायका गुण्यागोविंदाने संसार करतात.

एकावे ते नवलच... भारतातील या गावात प्रत्येक पुरुष करतो दोन लग्न; जाणून घ्या, काय आहे त्यामागचे रहस्य!
Image Credit source: twitter
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 23, 2022 | 2:45 PM

जगातील बहुतेक देशांमध्ये पुरुषाला एकच पत्नी करण्याचा अधिकार (Rights) आहे. जर एखाद्या व्यक्तीने भारतात लग्न केले असेल तर तो घटस्फोटाशिवाय पुन्हा लग्न करू शकत नाही. घटस्फोटाशिवाय दुसरा विवाह बेकायदेशीर मानला जातो. पण भारतात असे एक गाव आहे जिथे दोन लग्न करणे अनिवार्य आहे. हे गाव देशातील राजस्थान राज्यात आहे. येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दोन विवाह केले आहेत. या गावात दोन लग्न करणाऱ्या लोकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही किंवा त्या व्यक्तीच्या दोन्ही बायका अधिकारासाठी आपसात भांडतही नाहीत. पुरुषाच्या दोन्ही बायका एकाच घरात बहिणीप्रमाणे (Like a sister) राहतात. हे अनोखे गाव राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आहे, ज्याचे नाव रामदेव गाव आहे. या गावात राहणारा एक व्यक्ती दोन लग्न करतो, त्यामागे एक जुनी परंपरा आहे. या गावात लग्न करणाऱ्या पुरुषाची पत्नी गर्भधारणा (Pregnancy) करत नाही, असे सांगितले जाते. पहिली बायको गरोदर राहिली तरी मुलगीच जन्माला येते. यामुळे येथील लोक दुसरे लग्न करतात.

या गावात प्रत्येक पुरुष करतो दोन लग्न

हे अनोखे गाव राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आहे, ज्याचे नाव रामदेव गाव आहे. या गावात राहणारा एक व्यक्ती दोन लग्न करतो, त्यामागे एक जुनी परंपरा आहे. या गावात लग्न करणाऱ्या पुरुषाची पत्नी गर्भधारणा करत नाही, असे सांगितले जाते. पहिली बायको गरोदर राहिली तरी मुलगीच जन्माला येते. यामुळे येथील लोक दुसरे लग्न करतात.

दुसरी पत्नी फक्त एका मुलाला देते जन्म

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक पुरुषाची दुसरी पत्नी फक्त एका मुलाला जन्म देते. त्यामुळे वंश वाढवण्यासाठी पुरुषांनी पुन्हा लग्न करणे बंधनकारक आहे. या गावात एका पुरुषाच्या दोन बायका बहिणींसारखे जीवन जगतात. या प्रथेबद्दल सर्वांनाच माहिती आहे, कदाचित त्यामुळेच पहिली पत्नी आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाला विरोध करत नाही.

नव्या पिढीला प्रथा आवडत नाहीत

नव्या पिढीतील तरुणांना ही परंपरा आवडत नाही. दोन लग्न करणे बेकायदेशीर आहे. आता लोक म्हणतात की हे पुरुषांसाठी पुन्हा लग्न करण्यासाठी एक निमित्त आहे. हे गाव विलक्षण परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. प्रशासनालाही या गावातील चालीरीती माहीत आहेत. मात्र कोणावरही कारवाई होत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us