चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता थेट उद्योगमंत्री मैदानात, उदय सामंत घेणार बैठक
मोठी बातमी समोर येत आहे, चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता थेट उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 16 ऑगस्ट रोजी उदय सामंत हे यासंदर्भात प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे, आता चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी थेट मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. ते या संदर्भात एक बैठक घेणार आहेत. येत्या 16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. चाकणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हालचालींना वेग आला असून, आता उदय सामंत हे येत्या 16 ऑगस्ट रोजी बैठक घेणार आहेत. औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंत यांची फोनवरून चर्चा झाली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर चाकणमध्ये उद्योजकांना भेडसवणाऱ्या समस्यांवर तोडगा निघण्याची शक्ता आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे उद्योजक नाराज आहेत. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यावरून उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. उद्योजकांच्या नाराजीनंतर आता प्रत्यक्ष उद्योग मंत्री उदय सामंत हे मैदानात उतरले आहेत. ते येत्या 16 ऑगस्ट रोजी चाकणमधील विविध प्रश्नांसंदर्भात प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत, त्यामुळे या समस्यांर आता तोडगा निघणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंत यांची फोनवरून चर्चा झाली आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
चाकण हे महाराष्ट्रातील एक मोठं औद्योगिक केंद्र आहे. त्यामुळे येथील उद्योजकांना हव्या असलेल्या पायभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना भेडसवणाऱ्या अडचणी दूर करणे या साठी प्रशासन प्रयत्नशील आहे, उद्योजकांना ज्या काही रस्त्यांसंबंधित किंवा इतर काही अडचणी जाणवत असतील, त्या अडचणींची प्रत्यक्षात माहिती घेऊन, त्या -त्या विभागाशी योग्य तो समन्वय साधून या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न होईल असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच आता येत्या 16 ऑगस्ट रोजी उदय सामंत हे प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे
