भारत मलेरियामुक्तीच्या दिशेने, रुग्णांमध्ये 24 टक्क्यांनी घट

मुंबई : मलेरिया आजारासंदर्भात भारतातील आरोग्य क्षेत्रात काहीशी दिलासादायक बाब घडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) मलेरियासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला असून, या अहवालानुसार भारतात गेल्या वर्षात मलेरियाचे प्रमाण 24 टक्क्यांनी घटले आहे. जगातील सर्वाधिक मलेरियाग्रस्तांच्या 11 देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या देशांच्या तुलनेत भारताने मलेरियावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. […]

भारत मलेरियामुक्तीच्या दिशेने, रुग्णांमध्ये 24 टक्क्यांनी घट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : मलेरिया आजारासंदर्भात भारतातील आरोग्य क्षेत्रात काहीशी दिलासादायक बाब घडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) मलेरियासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला असून, या अहवालानुसार भारतात गेल्या वर्षात मलेरियाचे प्रमाण 24 टक्क्यांनी घटले आहे. जगातील सर्वाधिक मलेरियाग्रस्तांच्या 11 देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या देशांच्या तुलनेत भारताने मलेरियावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

मलेरिया आजारावर नियंत्रण मिळवण्यात भारताने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. तब्बल 24 टक्क्यांनी भारतातील मलेरियाचे प्रमाण कमी झाला आहे. भारतातली इतर राज्यांच्या तुलनेत ओडिशा हे राज्य मलेरिया नियंत्रणात अव्वल आहे. ओडिशात तर मलेरियामुळे मृतांची संख्या दोन अंकावर सुद्धा नाही.

सर्वाधिक मलेरियाचे प्रमाण असलेल्या जगातील 11 देशांमध्ये भारताचा समवेश होतो. बुर्किनो फासो, कामेरुन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द कोंगो, घाना, माली, मोझॅम्बिक, नायजर, नायजेरिया, उगांडा, यूनायटेड रिपब्लिक ऑफ टान्झानिया हे आफ्रिका खंडातील दहा देश आणि भारत अशा एकूण 11 देशांमध्ये जगात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळतात. मात्र, या भारताने मलेरियाच्या नियंत्रणावर आता यश मिळवले असून, बऱ्यापैकी मलेरियाच्या प्रमाणात घट केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारीनुसार, जगभरात 2017 या वर्षात मलेरियाचे 15 कोटी 10 लाख रुग्ण आढळले, तर याच वर्षात 2 लाख 74 हजार मलेरियाग्रस्त मृत्यूमुखी पडले.

दरम्यान, भारताने आता मलेरियावर प्रभावी प्रमाणात नियंत्रण मिळवेल असून, भारतीय आरोग्य क्षेत्रात नक्कीच सकारात्मक गोष्ट आहे. शिवाय, मलेरियामुक्तीच्या दिशेने भारताचं हे पहिलं पाऊल मानायला काहीच हरकत नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.