AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवात सरकारने उचललं मोठं पाऊल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तुमच्यावरचा ताण कमी होणार

Oil Rate: गणेशोत्सव सुरु असताना मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात वाढत्या अन्नधान्याच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी तयारी सुरू आहे.

गणेशोत्सवात सरकारने उचललं मोठं पाऊल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तुमच्यावरचा ताण कमी होणार
| Updated on: Sep 17, 2026 | 2:20 PM
Share

गणेशोत्सव सुरु असताना मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात वाढत्या अन्नधान्याच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी तयारी सुरू आहे. सरकार खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला, तर तेलाच्या वाढत्या किमती नियंत्रणात येऊ शकतील आणि सणासुदीमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल, असा दावा रॉयटर्सच्या एका अहवालात करण्यात आला आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. देश आपल्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी जवळपास दोन-तृतीयांश तेल परदेशातून आयात करतो. भारत प्रामुख्याने पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल आयात करतो. ही तेलं मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेनसारख्या देशांमधून येतात.

भारतात गेल्या वर्षभरात वनस्पती तेलाच्या किमती अंदाजे २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामामुळे तेलाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या काळात घरांमध्ये अधिक मिठाई, स्नॅक्स आणि इतर तळलेले पदार्थ तयार केले जातात आणि खरेदी केले जातात. अशा परिस्थितीत, किमतींवरील दबाव कमी करण्यासाठी सरकार आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे.

एका सरकारी सूत्राचा हवाला देत अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, वाढत्या महागाईपासून लोकांना दिलासा देणे हा सरकारचा उद्देश आहे, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार केला जाईल. सरकार मूलभूत आयात शुल्क ५ टक्क्यांनी कमी करू शकते. यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या किमती सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत पातळीच्या वर ठेवण्यास आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत होऊ शकते. आयात शुल्क कमी करण्याचा आणखी एक परिणाम होऊ शकतो. भारतातील वाढत्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमती वाढू शकतात. उद्योग अधिकाऱ्यांनी सांगितले की, याच कारणामुळे, केवळ आयात शुल्क कमी करणे हा किमती नियंत्रित करण्याचा प्रभावी मार्ग ठरू शकत नाही.

Follow Us
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच