AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील कॅनडाच्या आरोपांवर भारताची कारवाई, उच्चायुक्तांना बोलावले

कॅनडा सरकार सध्या भारताच्या विरोधात जाऊन काम करत आहे. कॅनडातील एका विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी कॅनडा सरकारकडून या सर्व गोष्टी होत आहे. त्यांचा आरोप हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. कॅनडाने आता गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतल्याने भारताने कडक कारवाई केली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील कॅनडाच्या आरोपांवर भारताची कारवाई, उच्चायुक्तांना बोलावले
| Updated on: Nov 02, 2024 | 7:08 PM
Share

भारताने गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल कॅनडाच्या मंत्र्यांची केलेल्या वक्तव्यावर जोरदार उत्तर दिले आहे. कॅनडाच्या मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे बेताल आणि निराधार असल्याचे भारताने म्हटले आहे. याबाबत भारताने तीव्र निषेधही नोंदवलाय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, कॅनडाच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले असून भारताच्या बाजूने निषेध नोंदवण्यात आला आहे. बेजबाबदार कृत्यांमुळे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील असे ही ते म्हणाले. भारताची बदनामी करण्यासाठी आणि इतर देशांवर प्रभाव टाकण्यासाठी कॅनडा जाणूनबुजून बिनबुडाचे आरोप करत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे की, कॅनडाचे अधिकारी जाणूनबुजून भारताविरुद्ध निराधार गोष्टी आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये पसरवत आहेत. ज्यामुळे भारताच्या प्रतिमेला डाग लागेल. यावरून असे दिसून येते की, कॅनडा सरकारच्या राजकीय अजेंड्यावर भारत काय विचार करत आहे ते योग्य आहे. अशा बेजबाबदार गोष्टींमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव वॉशिंग्टन पोस्टला लीक केल्याचे सांगितले. यानंतर एकच गोंधळ उडाला. कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावाद्यांना लक्ष्य करण्याच्या मोहिमेमागे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

कॅनडाने केलेल्या या आरोपांवर गदारोळ झाला. भारताने याला निरर्थक आणि निराधार म्हटले आहे. भारताच्या गृहमंत्र्यांवर कॅनडाचे आरोप चिंताजनक असल्याचे अमेरिकेने बुधवारी म्हटले आहे. या प्रकरणी कॅनडाच्या सरकारशी सल्लामसलत सुरू ठेवणार असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

कॅनडाच्या संसदेत दिवाळी साजरी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही या संदर्भात काही अहवाल पाहिले आहेत. हे दुर्दैवी आहे की कॅनडातील सध्याचे वातावरण असहिष्णुता आणि अतिरेकीपणाच्या उच्च पातळीवर पोहोचले आहे. कॅनडाच्या सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची संख्या कमी केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की आम्ही कॅनडामध्ये काम करणाऱ्या आमच्या लोकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला काळजी आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.