भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य काय?
Padmanabhapuram Palace हा एक स्थापत्य केलेचा चमत्कार आहे. येथे आत पाऊल ठेवताच साक्षात इतिहास जिवंत होतो. या राजवाड्यात अनेक रहस्य दडलेली आहेत.

भारताच्या एकदम दक्षिणेला एक असे शाही महल आहे. जेथे पाऊल ठेवताच आपल्या आपण ४०० वर्षे मागे गेल्याचे वाटते. आपण चर्चा करत आहोत पद्मनाभपुरम पॅलेसची आहे. हे महल त्याच्या गुप्त भूमिगत भूयारे, शतकाहून जून्या पेंटिग्स आणि लाकडाच्या उत्कृष्ट कोरिव कामासाठी ओळखले जाते. हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे, या मंदिराची काय वैशिष्ट्ये आहेत हे पाहूयात…
हे साम्राज्य १६०१ चे आहे जेथे वेनाड साम्राज्याचे राज्य होते. १७५० पर्यंत महाराजा मार्तंड वर्मा यांनी त्यांचे राज्य भगवान पद्मनाभ यांना समर्पित केले आणि या राजधानीचे नाव बदलून पद्मनाभपुरम असे करण्यात आले होते. ज्याचा अर्थ “भगवान पद्मनाभ” यांचे निवासस्थान होय.
हे लाकडी महल म्हणजे आश्चर्य
या महलाची फरशीची जमीन आजही काचे सारखी चमकते आणि इतिहासकार यांना हे मोठे रहस्य वाटते. म्हटले जाते कारागिरांनी यास तयार करण्यासाठी कोळसा, चुना, जळालेले नारळाचे करवंट्या आणि झुडूपांच्या रसांचा वापर केला होता. परंतू या बनवण्याची पद्धत नेमकी काय होती याचा कोणताही लिखित रेकॉर्ड उपलब्ध नाही.
राजमातेचे महाल या महालाचा सर्वात जूना भाग आहे. येथे एक पारंपारिक अंगण आहे.ज्याच्या चारी बाजूला लाकडाचा सुंदर कोरिव काम केलेले आहे. येथे एक गुप्त भूमिगत भूयार आहे. ज्याचा वापर राजा-महाराजांना अडचणीच्या काळात गुपचूपपणे सुरक्षित पळण्यासाठी करण्यात यायचा.
राजाचा एक बैठकीची खोली होती. त्याला अशाप्रकारे डिझाईन केले होते की बाहेर कितीही उष्णता असली तर ही खोली नेहमीच नैसर्गिक रित्या थंड राहायची. हीचा लाकडी झरोक्या खिडक्या तीव्र उन्हाला रोखायच्या मात्र थंड हवेला आत येऊ द्यायच्या.
येथील विशाल डायनिंग हॉल त्रावणकोरच्या राजांचे मोठे हृदय आणि त्यांच्या श्रीमंतीची कहाणी सांगत आहेत. जुन्या काळात जेव्हा कोणताही मोठा शाही उत्सव असायचा तेव्हा येथे एक साथ हजारो पाहुण्यांना मेजवाणी दिली जायची.