AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘येथील माती नेणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट’, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान पोहोचले वीर सुरेंद्र साईंच्या गावी

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सोमवारी ओडिशातील संबलपूर जिल्ह्यातील खिंडा गावात पोहोचले होते, जिथे ते मेरी माटी मेरा देश कार्यक्रमात सहभागी झाले होते. वीर सुरेंद्र साईंचा जन्म याच गावात झाला. या गावातून पवित्र माती घेणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

'येथील माती नेणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट', केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान पोहोचले वीर सुरेंद्र साईंच्या गावी
| Updated on: Oct 24, 2023 | 2:52 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सोमवारी ओडिशात पोहोचले होते. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात भाग घेतला. यादरम्यान त्यांनी स्वातंत्र्यसैनिक वीर सुरेंद्र साई यांच्या जन्मस्थानाला भेट दिली आणि ओडिशातील संबलपूर जिल्ह्यातील खिंडा गावात घरातून पवित्र माती गोळा केली.

यावेळी लोकांना संबोधित करताना धर्मेंद्र प्रधान यांनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. केंद्र सरकारने स्वातंत्र्यसैनिकांसाठी सुरू केलेल्या कार्यक्रमाची माहितीही त्यांनी दिली.

ते म्हणाले की, मेरी माटी मेरा देश या मोहिमेअंतर्गत देशातील सर्व गावागावांतून विशेषत: महापुरुषांच्या जन्मस्थळांवरून पवित्र माती गोळा केली जात आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी भारताला विकसित देश बनवण्यासाठी पंच प्राणाचा मंत्रही दिला आहे.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, इंग्रजांविरुद्ध प्रदीर्घ काळ लढून आपले शौर्य सिद्ध करणाऱ्या सुरेंद्र साईंचे जन्मस्थान संबलपूर, खिंडा येथून आज पवित्र माती गोळा करणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या मोहिमेत स्थानिक लोकांचा सहभाग उत्साहवर्धक आहे.

आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना तुम्ही लोकांनी सुरेंद्र साईंच्या मूल्यांचे स्मरण करून लोकांच्या लढ्यासाठी आणि हक्कांसाठी संघटित व्हा आणि खिंडा गावाचे सौंदर्यीकरण करून ते पर्यटनाचे केंद्र बनवा, असे त्यांनी म्हटले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.