AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीव धोक्यात घालून वाचवले 5 बालकांचे प्राण, पण स्वत:च्या मुलास गमावले? झाशी दुर्घटनेतील बापाची करुण कहानी

Jhansi Medical College Fire: प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य केल्याबद्दल मला रुग्णालय प्रशासनाकडून धमक्या येत आहेत. त्यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. परंतु मी जे पाहिले ते सांगणार आहे.

जीव धोक्यात घालून वाचवले 5 बालकांचे प्राण, पण स्वत:च्या मुलास गमावले? झाशी दुर्घटनेतील बापाची करुण कहानी
कुलदीप सिंह
| Updated on: Nov 17, 2024 | 10:01 AM
Share

Jhansi Medical College Fire: उत्तर प्रदेशातील झांसी येथील जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव घडले. या दुर्घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसला. काही दिवसांच्या मुलांना आई-बापाने गमावले. या रुग्णालयात कुलदीप यांनी त्यांच्या मुलास आठवड्यापूर्वी दाखल केले होते. शुक्रवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर त्या मुलाचा काहीच पत्ता लागत नाही. परंतु कुलदीप यांनी स्वता:च्या जीवावर उदार होत पाच नवजात बालकांचे प्राणे वाचवले. मात्र, स्वत:च्या मुलाचा पत्ता लागत नसल्यामुळे भावूक होत ते म्हणाले, ‘मर ही गया, क्या उम्मीद करें सर…’

पाच मुलांना वाचवले, पण…

महोबा जिल्ह्यातील कुलदीप सिंह यांच्या मुलाचा जन्म 9 नोव्हेंबर रोजी झाला. त्या मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी त्याला झांसीमधील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. शुक्रवारी रात्री दुर्घटना घडली तेव्हा कुलदीप मुलासाठी औषध आणण्यास गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना रुग्णालयात आग लागल्याची माहिती दिली. कुलदीप धावतच वार्डमध्ये दाखल झाले. त्यावेळी आगीने रौद्र रूप धारण केले होते. सर्वत्र प्रचंड आक्रोश माजला होता. मग कुलदीप सिंह यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुलांकडे धाव घेतली. त्यांनी पाच मुलांना वाचवले. परंतु त्यांच्या स्वत:चा मुलाचा थांगपत्ता लागला नाही. त्या वार्डमध्ये 54 मुले होती. दुर्घटना घडली तेव्हा ज्या लोकांची मुले होते, त्यांनी आत घुसून त्यांना वाचवले.

कुलदीप म्हणाला, ‘मी दुसऱ्यांचा मुलांना वाचवले. परंतु माझ्या मुलाचा मृत्यू झाला. माझा तो पहिलाच मुलगा होता. त्याचा काहीच पत्ता लागत नाही. आम्ही त्याचा शोध घेऊन थकलो आहे. अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नाही. या मुलांना वाचवताना माझा हात जळाला.’

रुग्णालय प्रशासनाकडून धमक्या

कुलदीप सिंह यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य केल्याबद्दल मला रुग्णालय प्रशासनाकडून धमक्या येत आहेत. त्यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. परंतु मी जे पाहिले ते सांगणार आहे. आगीत जखमी झालेल्या 16 मुलांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 10 मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. एका मुलाला डिस्चार्ज दिला आहे. तसेच 7 मुलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....