जिओ- एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबरी, कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, 50 रूपयांनी मोबाईल रिचार्ज..

इराण आणि अमेरिका युद्धात सर्वच गोष्टींच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामध्येच मोबाईल रिचार्जच्या किमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. यादरम्यानच आता मोठी बातमी पुढे येत आहे.

जिओ- एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबरी, कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, 50 रूपयांनी मोबाईल रिचार्ज..
Jio and Airtel
| Updated on: Jun 13, 2026 | 6:48 AM

इराण आणि अमेरिका युद्धात महागाई वाढत आहे. त्यामध्येच मोबाईल कंपन्या देखील रिचार्जचे भाव वाढवणार असल्याची चर्चा होती. मोबाईलच्या रिचार्जचे भाव वाढणार असल्याने ग्राहक चिंतेत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या किमतीत वाढ होत आहे. यादरम्यानच आता Jio, Airtel च्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. टेलीकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला. जुलै 2024 मध्ये अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेच्या या टॅरिफनंतर टेलीकॉम कंपन्यांनी थेट रिचार्जच्या किमतीत वाढ केली. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, कंपन्या सध्याच रिचार्जच्या किमती वाढवणार नाहीत. रिपोर्टनुसार, जागतिक समस्या आणि वाढती महागाई यादरम्यान टेलीकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवण्यापासून वाचू शकतात.

तेल, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि प्रवास हे सर्वकाही महागले आहे. ज्यामुळे याचा थेट फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. त्यामध्येच आता मोबाईलचे रिचार्ज देखील वाढू शकतात, असा अंदाजा होता. ज्यामुळे लोकांना अजून समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते, टॅरिफ वाढल्याने मोबाईल कंपन्यांनी 15 टक्क्यापर्यंत रिचार्जच्या किमतीत वाढ केली होती. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, 15 टक्के रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ केली तर प्रत्येक रिचार्जमागे 50 रूपये वाढू शकतात.

आज ज्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो, त्यांच्या किमतीमध्ये जास्त बदल होऊ शकतो. ज्यामध्ये करोडोंच्या घरात लोकांवर बोजा पडेल. जर भविष्यात टॅरिफ वाढले तर नक्कीच मोबाईल रिचार्जच्या किमती नक्कीच वाढू शकतात. 2024 मध्येच देशातील प्रमुख टेलीकॉम कंपन्यांनी मोबाईल प्लानच्या किमतीत वाढ केली होती. त्यामुळे यावेळी रिचार्जच्या किमती वाढवतील, याची शक्यता खूप जास्त कमी आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगात बसत आहे. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच टेलीकॉम कंपन्यांनी हा मोठा दिलासा दिला. Jio, Airtel  ग्राहकांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, जर अमेरिकेने पुन्हा भारतावरील टॅरिफ वाढवला तर टेलीकॉम कंपन्या मोबाईलच्या रिचार्जच्या दरात मोठी वाढ करू शकतात. महागाईचा झटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. सर्वच गोष्टींचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच मोबाईल कंपन्या रिचार्ज वाढवणार अशी चर्चा होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us