
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार देशातील 244 जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित करणार आहे. या ड्रिलचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशिक्षित करणे आहे. यामध्ये सायरन चाचणी, ब्लॅकआऊट व्यवस्थापनाचा सराव यांचा समावेश आहे. सरकारचा मुख्य हेतू नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे आणि संभाव्य धोक्यांशी लढण्याची क्षमता वाढवणे हा आहे. दरम्यान, कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेची आहे चला जाणून घेऊया…
मॉक ड्रिलची तयारी
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित होणार आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावामुळे गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या मॉक ड्रिलदरम्यान नागरिकांना हवाई हल्ल्यांपासून वाचण्याच्या उपायांबाबत माहिती दिली जाईल.
वाचा: ६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्…
ड्रिलदरम्यान सायरन वाजवले जातील. केंद्र सरकारने सर्व सहभागी राज्यांना त्यांच्या निर्वासन रणनीती सुधारण्याचे आणि संपूर्ण पूर्वाभ्यास कार्यक्षमतेने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. या ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याची चेतावणी देणाऱ्या सायरनचे संचालन आणि नागरिकांना हल्ल्याच्या परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा उपायांबाबत प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.
इतर उपायांमध्ये अपघाताच्या परिस्थितीत ब्लॅकआऊटचे उपाय, महत्त्वाच्या प्रकल्प आणि प्रतिष्ठानांचे संरक्षण, तसेच निर्वासन योजनांना अद्ययावत करणे आणि त्यांचा सराव करणे यांचा समावेश आहे. मॉक ड्रिलच्या एक दिवस आधी, म्हणजेच मंगळवारी, गृह मंत्रालयात बैठक झाली, ज्यामध्ये लोकांना प्रशिक्षण कसे द्यावे याचा आढावा घेण्यात आला.
मॉक ड्रिलमध्ये कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
मॉक ड्रिलमध्ये काय-काय होईल?
काय करू नये?