AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यातील लाठीमार अन् मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची काय भूमिका? म्हणाले…

Chhatrapti Sambhaji Raje on Jalna Lathi Charge : जालन्यातील लाठीमार अन् मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची काय भूमिका? इंडिया शब्द राज्यघटनेतून हटवला जाण्याची शक्यता आहे. यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले...

जालन्यातील लाठीमार अन् मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची काय भूमिका? म्हणाले...
| Updated on: Sep 05, 2023 | 3:58 PM
Share

नवी दिल्ली | 05 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी जालन्यातील अंतरवलीत उपोषण करण्यात येत होतं. यावेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेचा महाराष्ट्रभरातून निषेध करण्यात आला. ठिकाठिकाणी मोर्चे काढण्यात आले. शिवाय शहरं-गावं बंद ठेवण्यात आली. या सगळ्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. राज्यघटनेतील इंडिया हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. त्यावर संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका असेल. तुम्हाला आरक्षण मिळावायचं असेल तर वेगवेगळे पॅरामीटर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मागास म्हटलेलं नाही. पहिल्यांदा मराठा समाजाला आयोगाने मागास ठरवायला हवं. त्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया सोपी होईल, असं संभाजीराजे म्हणाले. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. यानंतर संभाजीराजे यांनी घटनास्थळी जात आंदोलकांची भेट घेतली. अंतरवाली सराटीत जात संभाजीराजे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. तसंच आपण सोबत असल्याचं सांगत धीर दिला. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा या मुद्द्यावर भाष्य केलं.

दुर्गम आणि दुर्बल भागातील लोकांना 50 टक्क्याच्या वर आरक्षण देता येतं. अन्यथा केंद्राला बदल करावा लागेल. क्युरेटीव्ह पिटीशन अगोदरच टाकायला हवी होती. हा राज्याचा प्रश्न आहे. निजामाने मराठ्यांना कुणबी केलं होतं. मराठवाड्यातल्या कुणब्यांना आरक्षण द्यायला अशी मागणी जरांडे यांनी केली आहे. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता. जरांडे पाटीलांची प्रकृती खालावली आहे. या अगोदर मराठा समाजातील 40 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, असंही संभाजीराजे म्हणाले.

18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नवा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. यात देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जावा, असं विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यावरून संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. संभाजीराजेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे ‘इंडिया’ शब्द बदलून भारत केला जात असेल तर काही चुकीचं नाही, असं ते म्हणालेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.