PM नरेंद्र मोदी यांनी सेवातीर्थ येथे घेतली सचिवांची बैठक, आत्मनिर्भर भारताला गती देण्याचे दिले आदेश

पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी आज सेवातिर्थ या निवासस्थानी देशांच्या सचिवांशी हितगुज केले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर जनतेला येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे यावर योग्य मार्गदर्शन केले.

PM नरेंद्र मोदी यांनी सेवातीर्थ येथे घेतली सचिवांची बैठक, आत्मनिर्भर भारताला गती देण्याचे दिले आदेश
pm modi file photo
| Updated on: Jun 30, 2026 | 9:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सेवातिर्थ या निवासस्थानी आज दोन महत्त्वाच्या विषयांवर आपल्या सचिवांशी चर्चा केली आहे. यातील  पहिला विषय होता ‘व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभता  यासाठी नियमसुलभीकरण आणि  इतर सुधारणा’,  आणि दुसरा विषय होता ‘आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देणे’ अशा दोन विषयांवर पंतप्रधान मोदी यांनी सचिवांशी हितगुज केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सेवातीर्थ या सरकारी निवासस्थानी भारत सरकारच्या सचिवांशी संवाद साधला आहे. या महत्वाच्या चर्चेचा केंद्र बिंदू दोन महत्वाच्या विषयांवर होता. पहिला विषय होता की ‘व्यवसाय सुलभता ( Ease of Doing Business ) आणि जीवन सुलभता ( Ease of Living ) यासाठी नियमसुलभीकरण ( Deregulation )  आणि इतर सुधारणा’, आणि दुसरा विषय होता ‘आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देणे’

या संवादादरम्यान केंद्र सरकारच्या सचिवांनी त्यांचे मंत्रालय आणि विभागांकडून या दोन प्रमुख विषयांच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर यावेळी सचिवांनी प्रकाश टाकला. तसेच, विविध क्षेत्रांतील आव्हाने, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यात सुशासन आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी आखलेल्या धोरणांवरही देखील चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संवाद करताना ‘संपूर्ण शासन’ (Whole-of-Government) या दृष्टिकोनाचा अवलंब करण्यावर आणि विभागीय पातळीवरील भिंती (Silos) दूर करण्यावर भर दिला. एकात्मिक नियोजन आणि समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करीत त्यांनी पीएम गतिशक्ती या व्यासपीठाचा विविध विभागांमधील समन्वय आणि माहितीपूर्ण निर्णयप्रक्रियेसाठी अधिक व्यापक वापर करण्याचे आवाहनही पीएम मोदी यांनी केले.

येथे पोस्ट पाहा –

विविध सरकारी योजनांचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर होणारा प्रत्यक्ष आणि सकारात्मक परिणाम यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेत  सचिवांना केले.

Follow Us